शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पर्यटन क्षेत्राच्या विकासाला हवी चालना

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पर्यटन क्षेत्राला अधिक महत्त्व मिळत असताना सोन्याची भूमी असलेल्या या तालुक्याची प्रगती पर्यटन क्षेत्रात झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे़

राजकीय इच्छाशक्तीची गरज : तळेगाव, आष्टा, पिंपळखुटा या गावांचा व्हावा कायापालट धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पर्यटन क्षेत्राला अधिक महत्त्व मिळत असताना सोन्याची भूमी असलेल्या या तालुक्याची प्रगती पर्यटन क्षेत्रात झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे़ आजही या तालुक्यातील पर्यटन व तीर्थस्थळे उपेक्षित आहे़ या तीर्थस्थळांना दर्जा व शासनाचा निधी उपलब्ध झाल्यास पर्यटकांचा गर्दी या तालुक्याकडे राहील व महसुलातही वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़गुंजी टेकडी व पिंपळखुट्याला हवाय न्यायअर्जुनसिंग राणाच्या अंजनसिंगीत कान्होजी महाराजांचे जागृत मंदिर आहे.या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे़ कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे सहकारी असलेले चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ तालुक्यात गुंजी टेकडीवर आहे़ चिंधे महाराज यांनी आपल्या वैभवी जीवनाला रामराम ठोकून १९३४ साली ईश्वरांच्या शोधात वयाच्या १६ व्या वर्षी गृहत्याग केला़ त्यांनी या तालुक्यात त्याक ाळी श्रमदानातून रस्ते तयार केले़ भजन कीर्तन व प्रवचन यातून समाज जागृती केली़ अनेक भजने हिंदी व मराठी भाषेतून लिहिली आज संपूर्ण महाराष्ट्रात या कर्मयोगीची ख्याती असताना जिथे या महात्म्याची समाधी आहे त्या गुंजी टेकडीला पर्यटनस्थळ करणे आता शासनाच्या हाती आहे़ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जिल्ह्यातील विश्वधाम पिंपळखुटा येथे साकारले आहे़ तब्बल दीडशे मूर्ती या भक्तीधामात बालपणापासून नदीच्या तिरावर बसत असलेले संत शंकर महाराज हे गुरूची आराधना करीत असे़ केवळ अल्पशिक्षण असलेल्या या सदगुरूने गुरूमाऊलीच्या प्रेरणेने महिमामृत ग्रंथ लिहिला आहे़ आज त्यांचे अनेक ग्रंथ आहेत़ आठ हजार स्क्वेअरफूट जागेते साकारलेले विश्वमंदिर भक्तीधामात दररोज पाचशे भाविकांना अन्नदान करण्यात येते़ तीर्थस्थळाचा अधिक विकास होणे गरजेचे असताना येथील अनेक प्रस्ताव प्रशासनाच्या लालफितशाहीत अडकले आहे़ भक्त निवासा करीता पाचशे खोल्यांसाठी शासनाकडून अर्थसहाय्याची गरज आहे़ दररोज हजारो भाविक येथे येत असताना साधी अमरावतीवरून या तीर्थस्थळी जाण्यासाठी एसटी नाही़ ही बस सुरू करण्यासाठी प्रशासन पुढे येत नाही़तळेगाव दशासरला हवाय पर्यटन स्थळाचा दर्जाधामणगाव शहर हे स्वातंत्र्योत्तर काळातील शहर आहे़ परंतु या शहराचा पूर्वी चांदूररेल्वे तालुक्यात समावेश होता़ विस्ताराने मोठा असल्याने प्रशासकीय सोय म्हणून या तालुक्याचे विभाजन करण्यात आले़ सन १९९२ मध्ये धामणगाव तालुका अस्तित्वात आला़ तालुक्याचे केंद्रबिंदू असणाऱ्या या शहराचा भारताचाही केंद्रबिंंदू म्हणून उल्लेख आहे. या तालुक्याचे क्षेत्रफळ ६३,३२१़०६ हेक्टर असून गावाची संख्या ११२ तर ग्रामपंचायतींची संख्या ६२ व एक नगरपरिषद आहे़ धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे पुन्हा सुरू झालेला शंकरपट हे या तालुक्याचे भूषण ठरले आहे़ या पुरातन गावात पैराणिक काळातील दगडी चिऱ्यांची विहीर आहे़ दुसरी विहीर जुना बसस्थानक परिसरात आहे़ आजही या विहिरीत पाणी आहे़ हनुमानाचे मंदिर, महादेवाची पिंड व पौराणिक मूर्ती या मंदिरात अनेक वर्षांपासून आहेत. याकडे आज महसूल प्रशासनासोबतच सर्वांचे दुर्लक्ष आहे़ विशेषत: याच गावात गुप्तकालीन विटाने बांधलेल्या वास्तूचे पायवे व तळमजले आढळतात़ ब्रम्हपूर्वकालीन राजमनीकडून गौरविलेल्या विद्यावैभावाची कीर्ती ऐकून येथे जैन, बुध्द, महानुभव पंडित असे थोर विचारवंत येऊन गेलेत़ गावाचे पात्रीकरण सिध्द करणारे अनेक पुरावे येथे आहे़ पाण्यावर तरंगणाऱ्या विटांकडे आजही संशोधकांचे दुर्लक्ष आहे़ या विटा काळ्या रंगाच्या स्पंजसारखी छिद्रे असलेल्या सोळा, दहा व तीन अशा आकाराच्या असून त्या वजनाने हलक्या तसेच अतिशय टनक आहेत़ बैलबंडी गेली किंवा कुऱ्हाडीने तोडल्यास या विटा तुटत नाहीत़ विटा गुप्तकालीन असून त्या पाण्यावर कशा तंरगतात याचा शोध स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही घेण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही़ या गावाकडे आजही पर्यटक विभागाने लक्ष दिले आणि या वास्तूचे जतन केले तर हे गाव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंंदू ठरू शकते़मुंडाचे गाव मंगरूळ दस्तगीर अद्यापही उपेक्षिततालुक्यातील दुसरे गाव म्हणून मंगरूळ दस्तगीर या गावाचे पौराणिक महत्त्व आहे़ ज्यावेळी गावात उत्खनन होते़ त्यावेळी अनेक पुरातन मूर्ती या गावात मिळते़ मुंडाचे गाव म्हणून आजही ओळखले जाते़ इतिहासाची पाने चाळली असता कोरीव काम असलेले दत्तमंदिर, प्राचीन श्रीमंगला माता मंदिर चार खांबांवर उभे असलेले श्रीराम मंदिर व दत्तगीर महाराजांचे बुरूज पहायला मिळते़ या गावात पांडुरंग महाराज, केकाजी महाराज, दत्तगीर महाराज, बगाजी महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे़ इवेत निशानधारी संस्थेचे संस्थापक व सामाजिक क्रांतीचा झेंडा फडकविणारे श्रीसंत गणपती महाराज हे स्वातंत्र्यपूर्व काळात जाती-पातीचे क डे तोडून अांतरजातीय विवाह घडून आणणारे संत होऊन गेलेत़ वर्धा नदीकाठी असलेले बगाजी महाराज यांच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्यास भाविकांच्या गर्दीत अधिक भर पडू शकते़ सर्वेक्षर मंदिराकडे होतेय दुर्लक्ष आकर्षकांना वेध लावणाऱ्या तरोडा येथे टेकडी आहे़ जागृत सर्वेक्षर हनुमान मंदिर या टेकडीवर आहे़ हनुमान जंयतीच्या वेळीच नव्हे, तर दररोज भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात़ प्रशासनाकडून या मंदिराच्या व टेकडीच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे़ सर्वधर्म समभावाची वागणूक देणारे मौलाजी महाराज यांचे मंदिर उसळगव्हाण येथे आहे़ दररोज या मंदिरात भाविकांची मांदियाळी असते़ विरूळ रोंघे, सोनोरा काकडे, दिघी महल्ले, आदर्श ग्राम झाडा, वरूड बगाजी या गावांसह तालुक्यातील अनेक गावांची इतिहासाची नोंद घेऊन पर्यटक व भाविकांना आकर्षित करणारा धामणगाव तालुक्याला आगामी काळात उपेक्षित न राहता तीर्थस्थळ व पर्यटकांचा दर्जा मिळणे गरजेचे आहे़