शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

अमरावती : महाराष्ट्राताल ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चुन आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण ...

अमरावती : महाराष्ट्राताल ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चुन आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण विभागाची योजना प्रगतिपथावर असताना आता दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी शाळांच्या विकासाचा आणखी एक प्रयोग राबविण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वेळेस शाळांच्या विकासाकरिता ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातर्फे एक अभ्यासगट त्याकरिता दिल्लीला धाडण्यात येणार आहे.

दिल्लीतील सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरीचिंचवड आदी महानगरपालिका शाळांचा विकास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा विषय मागे पडला.

दरम्यान शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ सरकारी शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाअंतर्गत ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता विकासावरही भर दिला जाणार आहे.

//////

बॉक्स १

अभ्यासगट जाणार दिल्लीला

शालेय शिक्षण विभागाची ही योजना आकाराला येत असताना ग्रामविकास विभागानेही दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. दिल्लीतील अशा सरकारी शाळांचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षक आदींचा समावेश असलेला एक अभ्यासगट दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अभ्यासगटाने आपला अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना सादर करायचा आहे

///////

अभ्यास कसला?

दिल्लीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी-शिक्षकांकरिता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार सुधारण्यासाठी व अंगी शिस्त बाणवण्यासाठी राबविण्यात येणारी कार्यपद्धती यांचा अभ्यास हा गट करेल. दिल्लीतील केजरीवाल सरकारने खासगी शाळांप्रमाणे सरकारी शाळांचे रूप पालटवले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये डिजिटल वर्ग, सुसज्ज खेळाच्या सुविधा, जलतरण तलाव पाहायला मिळतात. या शाळांमध्ये गुणवत्ता विकास होऊन निकालही वधारला आहे.