शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या आशेवर पाणी, मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचा विकास शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 17:19 IST

गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा नागरिकांना होती. मात्र,

सूरज दहाट तिवसा (अमरावती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिवसा तालुक्यातील शिरजगाव (मोझरी) हे गाव दत्तक घेतले. यामुळे गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा शिरजगावच्या नागरिकांना होती. मात्र, मागील आठ महिन्यांत विकासाच्या केवळ प्रतीक्षाच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिरजगाव (मोझरी) हे तालुका मुख्यालयापासून १० किमी, तर राष्ट्रीय महामार्गापासून ४ कि मी अंतरावर आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कधी काळी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आजही कायम आहे. गावात जिल्हा परिषदेची व एक खासगी शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची दूरवस्था झाली आहे. गावात शेती सिंचनासाठी दोन तलाव आहेत. मात्र दोन्ही तलावांत पाण्याचे नियोजन होत नाही. परिणामी शेतकºयांना ओलिताविना शेती करावी लागते. गावातील शंभराहून अधिक शेतकºयांवर कर्जाची टांगती तलवार आहे. गावापर्यंत पोहचण्यासाठी खड्यातून वाट काढावी लागते. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून आठवड्यात एकदा भरणाºया आठवडी बाजाराची घाण पुढील बाजाराच्या दिवशीपर्यंत तशीच पडलेली असते. नाल्यांची स्वच्छता होत असल्याने दुर्गंध परसलेला आहे. गावातील सार्वजनिक वापराच्या स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गावा दत्तक घेतल्यावर त्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.प्रतिनिधी सरकारचे गोडवे गाणारा आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी स्वप्निल देसळे गावात आले. आता आपल्या गावाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासावर स्थानिकांशी चर्चा करण्यास नागरिकांनी पुढाकार घेतल्यावर प्रतिनिधी फक्त सरकारचे गुणगान करीत असल्याचे मत गावकºयांनी नोंदविले.अवैध दारूविक्रीला उधाणशिरजगावात दारूबंदी होती. आता गावात खुल्या पद्धतीने अवैध देशी दारू व गावठी दारू काढली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे गावकºयांसह युवा वर्ग दारूच्या आहारी जात आहेत. दारू बंदीसाठी उभारलेला नागरिकांचा लढादेखील अयशस्वी ठरला आहे. दारू विक्रीची तक्रार करावी तरी कुणाकडे, अशी अवस्था आहे. गाव दत्तक घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी नेमला असेल, तरी गावाचा विकास न होणे हे सरकारचे अपयशच आहे. येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. - यशोमती ठाकूर,आमदार, तिवसा   समस्या मात्र सुटत नसल्याने उंचावलेल्या आशा मावळू लागल्या आहेत. रस्ता नाही, गाव व्यसनाधीन झाले, कुणीच लक्ष देत नाही. विकास होणार कसा?- चंदू हगवणे, नागरिक शिरजगाव मागील आठ महिन्यांत गावात विकासकामे झाली नाहीत. मूलभूत सुविधा नाहीत, शेतीला जोड व्यवसाय नसल्याने युवकांचे लग्न जुळणे कठीण होत आहे. - विजय डोंगरे, युवक, शिरजगाव

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस