शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई परिसरात कांदा पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 6:16 PM

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस-वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कापूस, तूर, सोयाबीन पिकांनी पुरते गारद केले असताना, तीन दिवसांच्या अवकाळी पावसानेदेखील कांदाउत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.तीन दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकाचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे तो सडण्यास सुरुवात झाली असून, लाखो रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नांदगावपेठमध्येही नुकसानदोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नांदगावपेठ येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संत्रा, कांदा आणि लिंबूच्या पिकांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रामकृष्ण पोकळे, सुरेश भगत, विलास इंगोले, श्रीकृष्ण मुळे, प्रल्हाद पोकळे या शेतकऱ्यांना वादळाचा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन धीर द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.कवडीमोलभावात विकला जातोय कांदाशेतकऱ्यांचा कांदा निघण्यापूर्वी बाजारात येण्यापूर्वी त्याचे भाव तेजीत असतात. मात्र, बाजारपेठेत नवीन कांदा विकायला येताच दर पडतात. त्यात आता लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे कांदा चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात आहे. शहरातील बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल विकू शकला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरविला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.विक्रीवर परिणामकांद्याची लिलाव प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीची साधने व मालाची वाहतूक कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम दिसून येत आहे.कांद्याला लागली सडकांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती