शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा

By admin | Updated: November 10, 2014 22:36 IST

नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

अमरावती : नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी अल्पसा मोबदला देऊन या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पात गेल्यानंतर त्यांना उपजिविकेचे इतर कोणतेही साधन नसून दिलेल्या तोकड्या रक्कमेत सध्याच्या महागाईच्या काळात जमीन घेणे अशक्य होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी केली आहे. मागणी मंजूर न झाल्यास हे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. कलम २८ (अ) अंतर्गत २९६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २५० प्रकरणांचाच समावेश केला.मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना न्याय दिला नसल्याने अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांना रोजगार द्या अन्यथा शेतीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.उपोषण कर्त्यांमध्ये प्रवीण मनोहर, म. शकील म. नजीर, शे. इसमाईल शे. इसराईल, शे. दिवान शे. बुट्टू, रामकृष्ण पारवे, सुखदेवराव मेश्राम, पांडुरंग धनसुईकर, वासुदेव लव्हाळे, नारायण टाके, अ.बशीर शे. बट्टू, राजू पांडे, मारोतराव धंदेर, गणेश पांडे, माणिकराव विरुळकर व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे.