शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

डेंग्यू : उपाययोजनेत दिरंगाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:25 IST

शहरात डेंग्यूने उच्छाद घातला असताना, आरोग्य प्रशासनाला त्याच्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश की बाधित, हा घोळ घालून महापालिकेने आजपर्यंत उपाययोजनाच केल्या नाहीत. एप्रिलपासून ओरड होत असताना अहवालाच्या प्रतीक्षेतच महापालिका कालपव्यय केला. इतक्या गंभीर विषयात अहवाल प्राप्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा? : अमरावतीकर डासमुक्तीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यूने उच्छाद घातला असताना, आरोग्य प्रशासनाला त्याच्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश की बाधित, हा घोळ घालून महापालिकेने आजपर्यंत उपाययोजनाच केल्या नाहीत. एप्रिलपासून ओरड होत असताना अहवालाच्या प्रतीक्षेतच महापालिका कालपव्यय केला. इतक्या गंभीर विषयात अहवाल प्राप्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही.जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल झालेल्या १७६ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आता तीन महिने ओलांडून गेलेत; मात्र अद्याप एकाही रुग्णाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला नाही वा त्याबाबत प्रयत्नदेखील झाले नाहीत. यादरम्यान अनेक रुग्ण गंभीर अवस्थेला पोहोचले. खासगी उपचाराने बरेही झाले. हे रुग्ण डेंग्यूबाधित होते व अजूनही काही डेंग्यूबाधितांवर उपचार सुरूच असण्यावर खासगी डॉक्टर ठाम आहेत. महापालिका मात्र प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा करीत उपाययोजनांकडे मुद्दामच दुर्लक्ष करीत आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावर जर आरोग्य विभागाची धुरा असेल, तर जिल्हावासीयांनी आरोग्यविषयक न्याय मागावा तरी कुणाला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.नागरिकांंच्या भावनेशी खेळअहवालाची प्रतीक्षा करीत जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, डास निर्मूलनाच्या उपाययोजनांचा केवळ देखावाच केला गेला. जिल्ह्याभरात डासांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. विषाणुजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी तुंबली आहेत. काही रुग्णांचे तर जीवसुद्धा गेले असावेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला नागरिकांच्या जिवाचे मोलच नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या आरोग्यसेवेशी जुळलेल्या प्रत्येक बारीक-सारीक बाबींवर उपाययोजना करण्यासाठी शासनाने अधिकारी नेमले आहेत. नागरिकांच्या पैशातूनच या शासकीय अधिकाºयांना वेतन दिले जाते. मात्र, त्याच नागरिकांच्या जिवाशी जिल्हा प्रशासन खेळ खेळत असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात निर्माण झाले आहे. अशा गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून तत्काळ उपाययोजना करायला हव्यात, कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, मात्र, तसे न होता, केवळ नागरिकांच्या भावनांशीच खेळ खेळला जात आहे. ही शोकांतिका अमरावती जिल्ह्याची आहे.खासगी डॉक्टरांनाच नोटीसशहरातील काही खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या रुग्णालयातील रुग्णांचे रक्तजल नमुने महापालिकेच्या यंत्रणेमार्फत यवतमाळातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. खासगी रुग्णालयातील ही आकडेवारी मोठी आहे. मात्र, या आकडेवारीवर आक्षेप घेऊन महापालिकेचा आरोग्य विभाग खासगी रुग्णालयांला नोटीस पाठवून जाब विचारत आहे.पार्वतीनगर, रविनगर, महाविरनगर, चक्रधरनगरातील रुग्णांचे रक्तजल नमुने महापालिकेमार्फत शासकीय प्रयोगशाळेत पाठविले. मात्र, अद्याप अहवाल आला नाही.- अजय डफळे, एमडी, मेडिसीन. डफळे हॉस्पिटलया महिन्यात सात ते आठ रुग्ण आलेत, त्यांची एनएस १ एलायझा टेस्ट पॉझिटिव्ह आली. कन्फर्म रिपोर्टसाठी महापालिकेला रक्तजल नमुने पाठविले आहे.- स्वप्निल दुधाट, कन्सलटिंग फिजीशियन, गेट लाईफ हॉस्पिटलडेंग्यूचा एक रुग्ण उपचारानंतर बरा झाला. डेंग्यू रुग्णांवर सपोर्टींग मॅनेजमेंटनुसार उपचार करण्यात येते. प्लेटलेट कमी होणे, हे डेंग्यूच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. निदानासाठी चाचणी उपयुक्त आहे.- पंकज बागडे, फिजीशियनमहापालिकेकडून प्राप्त रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेन्टीनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येते. आठ ते दहा दिवसांत अहवाल अपेक्षीत आहे.- सुरेश तरोडेकर, जिल्हा हिवताप, अधिकारीग्रामीण भागात अद्यापही डेंग्यू रुग्णांची नोंद झालेली नाही. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता साथरोग व इतर आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.- सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.