शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

प्रात्यक्षिक, लेखी परीक्षेत स्वतंत्र उत्तीर्ण व्हावे लागणार

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक

अमरावती : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून ही अट लागू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार ८० गुणांसाठीच्या लेखी परीक्षेमध्ये किमान १६ वा त्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकणारे विद्यार्थीच यापुढे संंबंधित विषयांमध्ये उत्तीर्ण होवू शकतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य बोर्डाचे ८०-८० पॅटर्न लागून आहे. या पध्दतीनंतर दहावी आणि बारावीच्या निकालाने विक्रम गाठला आहे. निकालाच्या या टक्केवारीत वाढ गुणवत्तेमुळे नव्हे, तर एखादा विषय उत्तीर्ण होण्यासाठी लेखी आणि तोंडी परीक्षेमधील गुण एकत्र घेतल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे. महाविद्यालय आणि शालेय स्तरावरील प्रात्याक्षिक किंवा तोंडी परीक्षेदरम्यान गुणांची खैरात वाटल्याने हा निकाल वाढल्याचे निकष काढण्यात येत होते. परीक्षेसाठी लेखी आणि तोंडी परीक्षेमध्ये विशिष्ट किमान गुणांची अट लागू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मान्यताच न मिळाल्याने हा मुद्दा मागे पडला होता. तोंडी आणि लेखी परीक्षांसाठी ग्रेड सिस्टीम लागू करण्याची मागणी अनेक संस्थांकडून करण्यात येत होती. पुढील शैक्षणिक वर्षांपासून मात्र लेखी आणि तोंडी परीक्षेमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे होणार आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने यावर्षी ऐवजी पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळवावेच लागतील.