शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार रुपये प्रतिपूर्ती शुल्क, चौथ्या सोडतीची पालक वर्गातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:01 IST

आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश देणा-या शाळांना गतवर्षीप्रमाणे ५० टक्के प्रतिपूर्ती शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाही विभागातील ९५५ शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार ६१७ रुपये मिळणार आहेत.गरिबांच्या मुलांनाही दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून राज्यात ‘बालकांच्या हक्काचे व मोफत शिक्षण कायदा २००९’ अंतर्गत राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. मागील सहा वर्षांपासून अमरावती विभागात ९०० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे, तर दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. शिक्षण विभागाने २०१८-१९ चे प्रतिपूर्ती शुल्क प्रतिविद्यार्थी १७ हजार ६५७  रुपये करून ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळावा, यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ९५५ शाळांची नोंदणी करण्यात आली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल २६ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले होते. एकूण जागा १० हजार ५२२ असताना दुप्पटीहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा वाढली होती. अंतिम फेरीअखेर ८ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर अद्याप २०२८ जागा रिक्त आहेत. विविध कारणांनी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या जागांवर आॅफलाइन पद्धतीने करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शासनाने यावर्षी केवळ तीन फेºयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात आली.

टॅग्स :Schoolशाळा