शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

मागणी वाढताच युरियाची बोंबाबोंब; पिके वाढीवर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 2, 2023 17:45 IST

चढ्या भावानेही विक्री : जुलैअखेर १,३८२ मे. टन युरियाचा साठा शिल्लक

अमरावती : पावसाची उसंत असल्याने सध्या पिके वाढीवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांद्वारा रासायनिक खतांची मात्रा दिली जात आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झालेला आहे. जुलैअखेर १,३८२ मे. टन युरियाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे वाढीव दरानेही विक्री होत असल्याचे ग्रामीणमधील चित्र आहे.

मान्सून विलंबाने आल्याने यंदा खरिपाच्या पेरण्या २० ते ३० दिवसांनी उशिरा झाल्या, त्यातही ६ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू होती. यामध्ये तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे काही शेतात तलावसदृश स्थिती निर्माण झाली होती. तेथील पिके पिवळी पडल्याने वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीत परिणामकारक युरियाची मागणी वाढली असता ठणठणाट आहे.

याशिवाय खरिपाची पिके आता वाढीवर असताना युरिया देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना एकमात्र युरिया हे सर्वात स्वस्त म्हणजेच २६६ रुपये प्रतिबॅग मिळणारे खत आहे. त्यामुळे वापर वाढला आहे; परंतु, जिल्ह्यास नियोजित पुरवठा मागील दोन महिन्यात नसल्याने तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाने बफर स्टॉक मोकळा केला असला तरी तूट भरून निघालेली नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकFarmerशेतकरीAmravatiअमरावती