शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भूजलात २४ फुटांपर्यंत तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:41 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरणऐवजी पाण्याचा अनिर्बंध उपसा होत आहे. परिणामी जिल्ह्याची भूजलपातळी पाच वर्षांच्या तुलनेत १५ ते २४ फुटांपर्यंत खालावली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्याअखेर १७० निरीक्षण विहिरींच्या पातळीच्या नोंदीद्वारे हे धक्कादायक निरीक्षण नोंदविले.

ठळक मुद्देजून महिन्यातील स्थिती : अचलपूर, चांदूरबाजारसह अंजनगाव तालुक्यासाठी धोक्याची घंटा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरणऐवजी पाण्याचा अनिर्बंध उपसा होत आहे. परिणामी जिल्ह्याची भूजलपातळी पाच वर्षांच्या तुलनेत १५ ते २४ फुटांपर्यंत खालावली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्याअखेर १७० निरीक्षण विहिरींच्या पातळीच्या नोंदीद्वारे हे धक्कादायक निरीक्षण नोंदविले. विशेष म्हणजे अचलपूर, अंजनगाव व चांदूरबाजार तालुक्यात पाण्याचा अनिर्बंध उपसा होत असल्याने विदर्भातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक भूजलस्तर खालावला असल्याचे वास्तव आहे.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १७० निरीक्षण विहिरीच्या स्थिर पातळीचे सप्टेंबर, डिसेंबर, मार्च व मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निरीक्षण नोंदविण्यात येते. त्याची तुलना पाच वर्षांच्या भूजलपातळीशी केल्यानंतर जीएसडीएद्वारे निरीक्षण नोंदविण्यात येते व त्याद्वारे लघुपाणलोट ( रन आॅफ झोन) क्षेत्रातील भूजलपातळीची स्थिती माहिती होते. यंदा मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असता, पाच वर्षांपूर्वी याच दिनांकाला जिल्ह्याची भूजलपातळी ९.५७ मीटर होती. त्याच्या तुलनेत यंदा १२.१७ मीटर आहे. म्हणजेच पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील भूजलात सरासरी २.६० मीटरने कमी आलेली आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक ७.९३ मीटर, अचलपूर ७.७० मीटर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५.४९ मीटरने भूजलस्तर खालावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. या ठिकाणी सरासरी १० ते १२ मीटर खोलीपर्यंतचा भाग भूजल पुनर्भरणास योग्य आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात मागील चार वर्षांत सरासरी २५ ते ३५ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने कमी आलेली आहे. विशेष म्हणजे, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने भूजल पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. मात्र, याच काळात पावसाचा ताण राहिल्याने पुनर्भरणाऐवजी पिकांसाठी उपसा झाला व नंतरच्या काळातदेखील निरंतर होत राहिला. यासोबतच शहरात पाण्याचा अतिरिक्त वापर, औद्योगिक वापरामुळेही भूजलस्तरात मोठ्या प्रमाणावर कमी आली. जिल्ह्यातील ३५० वर गावांचे पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.जलयुक्त शिवारचे ३१८ कोटी पाण्यातपावसाचे पाणी शिवारात जिरवून शेती समृद्ध व्हावी व याद्वारे भूजलस्तरदेखील वाढावा, यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची १६ हजार १४२ कामे तीन वर्षांत करण्यात आली. यावर ३१८ कोटी ७८ लाखांचा खर्च झाला. याद्वारे ७५८ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची टंचाई आहे व भूजलस्तरदेखील २४ फुटांपर्यंत खालावल्याने या उपक्रमाची जिल्ह्यात पुरेवाट झाल्याचे वास्तव आहे.अमरावती शहरात१६ फुटांपर्यंत भूजलस्तर कमीअमरावती तालुक्यात १४ फुटांपर्यंत व शहरात १५ ते १६ फुटांपर्यंत भूजलात कमी आल्याची माहिती आहे. शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३५०० हातपंप व २० हजारांवर बोअरद्वारे अमर्याद उपसा होत आहे. याव्यतिरिक्तही रस्ते कामांसाठी दुभाजकावरच बोअरचे खोदकाम कंत्राटदारांनी केले आहे. त्याद्वारे प्रचंड उपसा होत आहे. या तुलनेत पुनर्भरण झालेले नाही. ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.दोन वर्षांत १२५ दिवस पावसाचा खंडमागील वर्षी जून महिन्यात १३ दिवस, जुलै ८, आॅगस्ट १४ व सप्टेंबर महिन्यात २६ दिवस असे एकूण ६६ दिवस पावसात खंड राहिला. त्यापूर्वी सन २०१७ मध्ये जून महिन्यात १४ दिवस, जुलै ८, आॅगस्ट १७ व सप्टेंबर महिन्यात १४ दिवस असे एकूण ५९ दिवस पावसात खंड राहिला. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात. म्हणजेच दोन वर्षातील २४० दिवसांपैकी १२५ दिवस पावसात खंड राहिला. त्यामुळे भूजल पुनर्भरणाऐवजी उपसा जास्त झाल्याचे वास्तव आहे.