शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

दीपालीच्या पार्थिवाला भडाग्नीपृूर्वीच तिचा कार्यभार दुसऱ्याला सोपविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता गोळी झाडून ...

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, दीपाली यांच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यापूर्वीच आरएफओ पदाचा कार्यभार दुसऱ्याला सोपविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हा किती असंवेदनशील आणि क्रूर प्रवृत्तीचा आहे, हे स्पष्ट होते.

दीपाली आत्महत्याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचे निलंबन करण्यात आले. त्याचेविरुद्ध भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ली तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, दीपाली यांच्या मृत्यूला एम.एस. रेड्डी हासुद्धा जबाबदार असल्यामुळे राज्याच्या वनमंत्रालयाने रेड्डी याची २६ मार्च रोजी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत बदली करण्यात आली. परंतु, रेड्डी याने २६ मार्च रोजी दीपाली यांचा आरएफओ पदाचा कार्यभार विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे आरएफओ पी.एन. ठाकरे यांच्याकडे सोपविला. दीपाली यांच्या मृत्युनंतर अवघ्या १६ तासांतच दुसऱ्याकडे आरएफओ पदाचा कार्यभार सोपविण्याची घाई का, असा सवाल उपस्थित होत आहे. रेड्डी याने जेव्हा दीपाली यांचा कार्यभार दुसऱ्याला सोपविला तेव्हा त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदनदेखील झालेले नव्हते. त्यामुळे रेड्डी याने ठाकरे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यामागे बरेच काही दडल्याचे बोलले जात आहे. हरिसाल आरएफओ पदाचा कार्यभार दुसऱ्याला सोपविण्यात रेड्डी याने एवढी घाई का केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर त्यांना न्याय मिळावा, यासाठी २६ मार्च रोजी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, वनाधिकारी, वनकर्मचारी संघटना, बेलदार समाज एकवटला होता. मात्र, त्याच दिवशी एम.एस. रेड्डी याने अमानवी प्रवृत्तीचा कळस गाठला आणि त्याच्या बदलीच्या दिवशीही दीपाली यांचा आरएफओ पदाचा कार्यभार ठाकरे यांना सोपविला.

-------------------

कार्यभार सोपविण्यात घाई का?

हरिसाल वनपरिक्षेत्रातील जंगल, वन्यजीव हे काही दुसरीकडे पळून जाणार नव्हते. असे असताना एसीसीएफ रेड्डी याने दीपाली यांच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी कार्यभार सोपविण्याची घाई केली. यामुळे हरिसाल आरएफओमध्ये काहीतरी अपहार, भ्रष्टाचाराचे कुरण दडविण्यासाठी ठाकरे यांना समोर करण्यात आले नाही, अशी चर्चा रंगत आहे.