शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan: शेर से डर नहीं लगता साब, ‘फॉरेस्ट’वालों से लगता है...दीपाली चव्हाणच्या आत्महत्येनंतरचे खळबळजनक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:45 IST

Deepali Chavan suicide case: ‘लेडी सिंघम’ दीपाली चव्हाण यांच्या अवेळी जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. दीपालीने तीन पानांची खळबळजनक सुसाईड नोट लिहून २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. निलंबित उपवनसंरक्षक व मुख्य आरोपी विनोद शिवकुमार आणि त्याचा वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांच्या अत्याचाराची कहाणी स्तब्ध करणारी आहे. 

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासींमध्ये एक म्हण प्रचलित आहे. “शेर से डर नहीं लगता साब, ‘फॉरेस्ट’वालों से लगता है.” वनविभागातील कारभाराचा अंदाज घेतला, तर त्यात तथ्य जाणवले. एकेकाळी मेळघाटातील अख्ख्या गावांवर वनरक्षक असलेल्या कर्मचाऱ्यांचा दरारा असायचा. पण, आता वन कर्मचारी ते वनपरिक्षेत्र अधिकारी डोक्यावरील आयएफएस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास, अत्याचार मुकाट सहन करताहेत. वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पातील अनेक कर्मचारी नोकरशाहीच्या प्रचंड दडपणाखाली असल्याचे वास्तव आहे.राज्यातील एकूण ६ व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. त्यापैकी सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट.  जंगलात स्थानिकांकडून सतत लावण्यात येणाऱ्या आगी, वन्य प्राण्यांसाठी पाणवठा व इतर व्यवस्था करणे, शिकारी रोखणे, सागवान, गोंद, बारशिंगाची तस्करी, पुनर्वसन, शिकारी व इतर आरोपींचा छडा लावून न्यायालयीन कामे सांभाळणे अशा अनेक कामांत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा प्रचंड दबाव असल्याचे दिसून येते. यातूनच वन कर्मचारी आणि आदिवासींमध्ये सतत संघर्ष उडतो. कनिष्ठ कर्मचारी परिवारासाठी जीव मुठीत घेऊन प्रत्येक रात्र काढतात. हे सर्व करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सततचा दबाव, अपमानास्पद वागणूक हा प्रकार नेहमीचा झाला आहे. तिन्ही महिला कर्मचाऱ्यांना रात्रीबेरात्री दिली जाणारी वागणूकही शहारे आणणारी आहे.आयएफएसचे लांगुलचालनमेळघाट व्याघ्र प्रकल्पात चार वन्यजीव विभाग आहेत. शासनाने २७ एपीसीसीएफ पदे निर्माण केली. पण, पद रिक्त नसेल तर खूप दिवस वाट पाहावी लागते. 

समस्यांचा पाढा...१. ९० टक्के महिला वन कर्मचाऱ्यांसाठी अगदी बेसिक सुविधाही नाहीत.२. ७२ तास महिला वन कर्मचारी पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करतात.३. सामूहिक जंगल गस्ती, रात्री-अपरात्री कॅम्पवर ड्युटी.४. दीपाली चव्हाण कार्यालय प्रमुख असतानाही महिलांसाठी शौचालय  नव्हते.५. क्षेत्रीय कर्मचारी राहात असलेल्या निवासस्थानाची अवस्था बकाल.६. शहराच्या ठिकाणी कुटुंबांना ठेवून कर्मचाऱ्यांचे वास्तव्य.७. मोबाईल रेंज नसल्याने ‘वायरलेस’ हेच संपर्काचे एकमेव साधन.८. अनेक ठिकाणी दवाखाने नसल्याने आजारपणातही रजा नाही.मेळघाटात.... २२३२ एकूण अधिकारी-कर्मचारी १ महिला एक उपवनसंरक्षक३ वन परिक्षेत्र अधिकारी३७ वनपाल२०० वनरक्षक २४० एकूण महिला 

‘उलटा-पिरॅमिड’!nवरिष्ठ अधिकाऱ्यांचा भरणा आणि कनिष्ठ यंत्रणेची संख्या तोकडी या प्रशासकीय स्थितीला ‘उलटा-पिरॅमिड’ असे संबोधले जाते. ५ प्रधान, २७ अप्पर प्रधान वनाधिकारी महाराष्ट्राचा कारभार पाहतात. nदहा अधिकारी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला दहा वेगवेगळे आदेश देतात. वन विभागातल्या रेंजर मंडळींची अवस्था त्यामुळे कथन करण्यासारखी नाही. 

नियमबाह्य कामेही...nकोणतेही काम व विशेष अधिकार नसलेले सुपर क्लासवन अधिकारी वेगवेगळ्या बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात. nनियमबाह्य कामे तोंडी सांगितली जातात. न केल्यास सीआर खराब करण्याची धमकी दिली जाते. केले तर चौकशी लागण्याची भीती. अशा अडकित्त्यात सापडेल्या मराठी अधिकाऱ्याने आत्महत्या न केली तरच नवल!

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग