शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशीच्या पेऱ्यात घट

By admin | Updated: August 10, 2015 00:07 IST

सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे.

पाऊस लांबल्याचा परिणाम : अनेकांच्या पिकाला आली मोड

नांदगाव खंडेश्वर : सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून ४८ हजार २११ हेक्टर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र आहे. पर्यायाने कापसाचे क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली असून फक्त ४ हजार ४११ हेक्टरवर कपासीचा पेरा आहे. सुरवातीला जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये पेरणीला सुरवात केली. नंतर पावसाने एक महिना दडी मारली असल्याने काही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या एक महिन्याचे उघाडीमध्ये निघालेले बियाण्याचे अंकुर करपायला सुरुवात झाली होती. परंतु २० ते २३ जुलैदरम्यान तालुक्यात पुन्हा हलका स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि खोळंबलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या असल्याने तालुक्यात दोन टप्प्यामध्ये पेरणी झाली. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदला. तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ४०० मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षीच्या तुलनेत तो जास्त आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत फक्त ३६८ मिमी पावसाची नोंद आहे. एक महिन्याचे विश्रांतीनंतर आॅगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी-नाल्यांना सुद्धा पाणी आले. अजून दोन महिने पावसाचा कालावधी असल्याने उत्तरार्धात तरी पाऊस सरासरी भरून काढेल या आशेवर शेतकरी आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून सोयाबीनवर कीटकनाशकाच्या फवारणीला शेतकरी गुंतला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये पेरणी झालेल्या क्षेत्रावर तण नाशकाची फवारणी, निंदन डवरणी या कामाची धूम आहे. तालुक्यात ४८२११ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ४ हजारने वाढ झाली असून कापसाचे क्षेत्र मात्र सरासरी ५ हजार हेक्टरने घटले आहे. त्याचबरोबर तूर पिकाचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. सोयाबीन ४८२११ हेक्टर, कपासी ४४११ हेक्टर, तूर ९३९५ हेक्टर, मूग २७७ हेक्टर, उडीद १२७ हेक्टर, संकरीत ज्वारी १७ हेक्टर क्षेत्र असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी भागवत आणि पं. स. चे कृषी अधिकारी सावळे यांनी दिली. नुकताच झालेला पाऊस समाधानकारक असून पिकाला पोषक असल्याने शेतकरी आनंदी आहे. परंतु शेतीच्या जुगारात निसर्गासोबतच्या खेळात शेवटी शेतकरी कितपत यशस्वी होतो हे मात्र येणारा काळच सांगू शकेल. (शहर प्रतिनिधी)