शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

सोयाबीन, कपाशीच्या पेऱ्यात घट

By admin | Updated: August 10, 2015 00:07 IST

सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे.

पाऊस लांबल्याचा परिणाम : अनेकांच्या पिकाला आली मोड

नांदगाव खंडेश्वर : सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून ४८ हजार २११ हेक्टर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र आहे. पर्यायाने कापसाचे क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली असून फक्त ४ हजार ४११ हेक्टरवर कपासीचा पेरा आहे. सुरवातीला जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये पेरणीला सुरवात केली. नंतर पावसाने एक महिना दडी मारली असल्याने काही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या एक महिन्याचे उघाडीमध्ये निघालेले बियाण्याचे अंकुर करपायला सुरुवात झाली होती. परंतु २० ते २३ जुलैदरम्यान तालुक्यात पुन्हा हलका स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि खोळंबलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या असल्याने तालुक्यात दोन टप्प्यामध्ये पेरणी झाली. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदला. तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ४०० मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षीच्या तुलनेत तो जास्त आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत फक्त ३६८ मिमी पावसाची नोंद आहे. एक महिन्याचे विश्रांतीनंतर आॅगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी-नाल्यांना सुद्धा पाणी आले. अजून दोन महिने पावसाचा कालावधी असल्याने उत्तरार्धात तरी पाऊस सरासरी भरून काढेल या आशेवर शेतकरी आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून सोयाबीनवर कीटकनाशकाच्या फवारणीला शेतकरी गुंतला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये पेरणी झालेल्या क्षेत्रावर तण नाशकाची फवारणी, निंदन डवरणी या कामाची धूम आहे. तालुक्यात ४८२११ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ४ हजारने वाढ झाली असून कापसाचे क्षेत्र मात्र सरासरी ५ हजार हेक्टरने घटले आहे. त्याचबरोबर तूर पिकाचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. सोयाबीन ४८२११ हेक्टर, कपासी ४४११ हेक्टर, तूर ९३९५ हेक्टर, मूग २७७ हेक्टर, उडीद १२७ हेक्टर, संकरीत ज्वारी १७ हेक्टर क्षेत्र असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी भागवत आणि पं. स. चे कृषी अधिकारी सावळे यांनी दिली. नुकताच झालेला पाऊस समाधानकारक असून पिकाला पोषक असल्याने शेतकरी आनंदी आहे. परंतु शेतीच्या जुगारात निसर्गासोबतच्या खेळात शेवटी शेतकरी कितपत यशस्वी होतो हे मात्र येणारा काळच सांगू शकेल. (शहर प्रतिनिधी)