शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात ४६ तालुक्यांतील भूजल पातळील घट; अकोला जिल्ह्यात भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 17:16 IST

पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ तालुक्यांतील ६४७ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची मोजमाप केल्यानंतर हा नित्कर्ष काढला. 

- गजानन मोहोड

अमरावती : पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ तालुक्यांतील ६४७ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची मोजमाप केल्यानंतर हा नित्कर्ष काढला. विभागात अकोला जिल्ह्यातील तीन तालुक्यांत १० फुटांपेक्षा भूजल पातळी खोल गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यावी तीव्र टंचाई आहे. आठ तालुक्यांत दोन ते तीन मीटरपर्यंत खालावली आहे. यामध्ये अमरावती व अकोला तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच वाशिम जिल्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. एक ते दोन मीटरपर्यंत २३ तालुक्यांची पातळी खोल गेली. यामध्ये अमरावती जिल्यात पाच, अकोला जिल्यात एक,  वाशिम जिल्ह्यात चार, व यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. ० ते एक मीटरपर्यंत १२ तालुक्यांची पातळी खोल गेली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पाच, बुलडाणा जिल्ह्यातील चार, व यवतमाळ जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत १,३११ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने १,६४१ उपाययोजना सयुंक्त स्वाक्षरी अहवालात विभागीय आयुक्तांना सुचविण्यात आल्यात, या कामांवर ११ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च होणार आहे.विभागात २०१७ मधील पावसाळ्यात सरासरी ७७७.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५८१.३ मिमी पाऊस पडला ही ७६ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांच्या तुलनेत फक्त ३६ दिवस पावसांचे राहिले. त्याचे  साईड इफेक्ट आता जाणवायला लागले आहेत. केवळ बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या भूजल पातळीत ० ते दोनमीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक  केतकी जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

अचलपूर तालुक्यातील पातळी सर्वाधिक कमीविभागात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात उणे ७.१८ मीटरपर्यंत, अंजनगाव सुर्जी उने ३.२१ पातळी कमी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा उणे ४.६४, बाळापूर उणे ३.९३, पातूर उणे ३.०४ मीटरपर्यंत पातळी खोल गेली आहे. या तालुक्यांमध्ये भूजल उपशावर निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. नवीन विंधन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) २००८ मधील ८(१) या तरतुदी अन्वये बंदी घालणे आवश्यक आहे.

विभागात यंदा पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत उपसा मात्र अधिक होत आहे. परिणामी विभागातील ४६ तालुक्यांतील भूजल पातळी शून्य ते तीन मीटरपर्यंत खाली आली आहे.- पी. व्ही. कठाणेउपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :Amravatiअमरावती