शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

१३ तालुक्यांच्या भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:20 IST

सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे.

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाची माहिती : ३०१ गावांना कोरड, ५६१ उपाययोजना

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे. पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या तुलनात्मक नोंदीनंतरचे हे निरीक्षण आहे. त्यामुळे एप्रिल ते जूनदरम्यान ३०१ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेद्वारा ५६१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात, यावर ४.०२ कोटींच्या निधींची गरज आहे.पावसाचे १२० दिवसात सरासरी ८१४ मिमीची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ५४८ मिमी पाऊस पडला, ही ६६ टक्केवारी आहे. केवळ ४५ दिवस पावसाचे राहिल्याने भुगर्भाचे पुर्नभरण झालेले नाही. परिणामी सप्टेंबर अखेरपासून भूजलात कमी आली. डिसेंबरनंतर रबीच्या हंगामासाठी पाण्याचा उफसा होत आहे तसेच त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा १४ तालुक्यांतील १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतरच जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत भूजल पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. मागील पाच वर्षाची जानेवारीअखेर भूजल पातळी ६.७३ मीटर होती, त्या तुलनेत यंदा ८.३७ मीटर आहे. म्हणजे जिल्ह्याच्या पाणीपातळीत उणे १.६४ मीटरने कमी आलेली आहे. यंदा भुजलात सर्वात कमी अचलपूर तालुक्यात आहे. या तालुक्यात उणे ७. १८ मीटरने पाणीपातळी कमी झालेली असल्याचे निरीक्षण नोंदविले.भूजलात गतीने घट झाल्यामुळे पाण्याचे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प वगळता तीन मध्यम प्रकल्पांत ५१.५२ टक्के, तर ४६ लघुप्रकल्पांत फक्त २१.५६ टक्के साठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहीत धरता या प्रकल्पांना मार्चच्या प्रारंभीच कोरड पडली असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असललेया शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत ५१.४३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ५७.३९ तर चंद्रभागा प्रकल्पात पूर्ण संचय पातळीच्या ४६.५७ टक्के साठा शिल्लक आहे. या प्रकल्पात असलेला मृत साठा व दररोज होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, या साठ्यामध्येदेखील झपाट्याने कमी येत आहे.पाणीटंचाई निवारणार्थ ५६१ उपाययोजनांची मात्रायंदाच्या उन्हाळ्यात ३०१ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे यासाठी जिल्हाप्रशासनाने ५६१ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये २०० विहिरींचे खोलीकरण व ९९ खासगी विहिरीमचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. ३९ टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ६७ गावांमध्ये नळ योजनांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तीण तात्पुर्त्या पूरक नळ योजना, १५ विंधन विहिरींची दुरूस्ती व १३४ विंधन विहिरींची दुरूस्ती केली जाईल.लघु, मध्यम प्रकल्पांनी गाठला तळमध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. यामध्ये ४६ पैकी १५ प्रकल्पात १० सद्यस्थितीत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये मालेगाव १८ टक्के, घाटखेड २४, बस्तापूर ३९, केकतपूर ४७, टोंगलफोडी १४, मालखेड १६, भिवापूर २४, दाभेरी २१, त्रिवेणी ४७, शेकदरी ४७,पंढरी २७, वाई ३९, सातनूर ४३,जामगाव २५,नागठाणा ३३, जमालपूर ३६, खारी ३२, साद्राबाडी २१, गावलानडोह २१, सावलीखेडा १६, गंडगा १८, रंभाड २०, बोबदो १७, लवादा १३, मारइ १५, जभेंरी १२, ज्युटपाणी १८,नांदूरी १५ टक्के साठा उपलब्ध आहे. लघु प्रकल्पात खतिजापूर, गोंडवाघोली, पिंपळगाव, टाकळी, सूर्यगंगा, दहीगाव, जळका, अमदोरी, दाभेरी, बेलसावंगी, बेबदा व मोगर्दा प्रकल्पात सद्यस्थितीत १० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.