शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वृक्ष लागवडीत घसरण; वनविभागात कोटींमध्ये नव्हे तर हजारांत वृक्ष लागणार?

By गणेश वासनिक | Updated: May 19, 2024 17:42 IST

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभाराचा फटका, वनविभागात आता ऐका... हो... ऐका...!

अमरावती : दरवर्षी कोटी वृक्ष लागवड करणाऱ्या वनविभागाची वाटचाल अधोगतीकडे सुरू झालेली असून एका अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभारामुळे यंदा राज्यात केवळ हजारो वृक्ष लागणार कारण अभिसरण योजना आणल्यामुळे वनविभागावर आता ऐका... हो.. ऐका अशी म्हणण्याची वेळ आलेली दिसून येते. सन २०१८ पासून ते २१ पर्यंत राज्याच्या वनविभागात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. ही योजना कमालीची यशस्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून वनविभागाने केवळ हजारोंच्या आत वृक्ष लागवड केलेली दिसून येत आहे. 

राज्याच्या वनविभागात आयएफएस लॉबीमध्ये नसलेला समन्वय आणि अंतर्गत चढाओढ या कारणाने वृक्षलागवडीच्या कामामध्ये वनविभाग माघारलेला आहे. यंदा राज्यात वनविभाग केवळ हजारो या अंकात वृक्षलागवड करणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. कारण अभिसरण 'टॉप ऑफ' ही योजना विचारात न घेता वनाधिकाऱ्यांच्या माथ्यावर मारल्यामुळे रोपवन होण्यास कुणीही इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना गावा-गावांत द्यावी लागेल दवंडी, ऐका हो... ऐकाराज्याच्या वनविभागात वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुख ही पदे कार्यकारी पदे असताना सध्या मात्र एका ‘के.के.’ नामक प्रधान मुख्य वनसंरक्षकांची दहशत वनविभागात आयएफएस लॉबी ते खाली वनकर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. सध्या केके जोमात असून आचारसंहितेमध्ये सुद्धा त्यांची गाडी सुसाट दिसून आली. 

दरदिवशी नवनवीन आदेश काढत असल्याने वनविभाग सध्या कमालीचा स्तब्ध झाला आहे. वनविभागात अजूनही पूर्व पावसाळी कामे न झाल्यामुळे वनविभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. अभिसरण योजनेत जॉबधारक मजूर उपलब्ध होण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावा-गावांत दवंडी पिटवून ऐका हो ऐका म्हणतं. कामावर येण्याचे आवाहन करावे, असा अजब फतवा काढलेला आहे. दवंडीत आदेशात मजुरी दर याचा उल्लेख होणे गरजेचे आहे असेही नमूद आहे. वनाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष‘के.के’ यांनी अभिसरण योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांवर काम करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने शासनास अहवाल सादर केल्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी समितीच्या अहवालास केराची टोपली दाखवित अभिसरण योजना राबविण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांना प्रमुख केलेले दिसून येत आहे. कल्याणकुमार सचिवांच्या मर्जीतील असल्याने राज्यातील आयएफएस कमालीचे दहशतीमध्ये काम करीत आहेत. कारण त्यांच्या मार्फत कनिष्ठ वनाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याची भावना वनविभागात निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती