शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

यंदा वृक्ष लागवडीत घसरण; वनविभागात कोटींमध्ये नव्हे तर हजारांत वृक्ष लागणार?

By गणेश वासनिक | Updated: May 19, 2024 17:42 IST

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभाराचा फटका, वनविभागात आता ऐका... हो... ऐका...!

अमरावती : दरवर्षी कोटी वृक्ष लागवड करणाऱ्या वनविभागाची वाटचाल अधोगतीकडे सुरू झालेली असून एका अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभारामुळे यंदा राज्यात केवळ हजारो वृक्ष लागणार कारण अभिसरण योजना आणल्यामुळे वनविभागावर आता ऐका... हो.. ऐका अशी म्हणण्याची वेळ आलेली दिसून येते. सन २०१८ पासून ते २१ पर्यंत राज्याच्या वनविभागात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. ही योजना कमालीची यशस्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून वनविभागाने केवळ हजारोंच्या आत वृक्ष लागवड केलेली दिसून येत आहे. 

राज्याच्या वनविभागात आयएफएस लॉबीमध्ये नसलेला समन्वय आणि अंतर्गत चढाओढ या कारणाने वृक्षलागवडीच्या कामामध्ये वनविभाग माघारलेला आहे. यंदा राज्यात वनविभाग केवळ हजारो या अंकात वृक्षलागवड करणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. कारण अभिसरण 'टॉप ऑफ' ही योजना विचारात न घेता वनाधिकाऱ्यांच्या माथ्यावर मारल्यामुळे रोपवन होण्यास कुणीही इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना गावा-गावांत द्यावी लागेल दवंडी, ऐका हो... ऐकाराज्याच्या वनविभागात वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुख ही पदे कार्यकारी पदे असताना सध्या मात्र एका ‘के.के.’ नामक प्रधान मुख्य वनसंरक्षकांची दहशत वनविभागात आयएफएस लॉबी ते खाली वनकर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. सध्या केके जोमात असून आचारसंहितेमध्ये सुद्धा त्यांची गाडी सुसाट दिसून आली. 

दरदिवशी नवनवीन आदेश काढत असल्याने वनविभाग सध्या कमालीचा स्तब्ध झाला आहे. वनविभागात अजूनही पूर्व पावसाळी कामे न झाल्यामुळे वनविभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. अभिसरण योजनेत जॉबधारक मजूर उपलब्ध होण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावा-गावांत दवंडी पिटवून ऐका हो ऐका म्हणतं. कामावर येण्याचे आवाहन करावे, असा अजब फतवा काढलेला आहे. दवंडीत आदेशात मजुरी दर याचा उल्लेख होणे गरजेचे आहे असेही नमूद आहे. वनाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष‘के.के’ यांनी अभिसरण योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांवर काम करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने शासनास अहवाल सादर केल्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी समितीच्या अहवालास केराची टोपली दाखवित अभिसरण योजना राबविण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांना प्रमुख केलेले दिसून येत आहे. कल्याणकुमार सचिवांच्या मर्जीतील असल्याने राज्यातील आयएफएस कमालीचे दहशतीमध्ये काम करीत आहेत. कारण त्यांच्या मार्फत कनिष्ठ वनाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याची भावना वनविभागात निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती