शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

आज फैसला !

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे.

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे. या निकालाबाबत आज शेवटच्या दिवशीही बाजारात सट्टा तेजीतच होता. या निवडणुकीत युती आणि आघाडीत फूट पडल्याने पाचही मतदारसंघात चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. परिणामी निवडणूक चुरशीची झाली. मतदानानंतर कोण उमेदवार विजयी होणार, याबाबत त्या-त्या पक्षांचे उमेदवार वगळता अन्य कोणीही ठाम दावा करताना दिसत नव्हते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, या विषयीची उत्सुकता कायम राहिली. अनेक दिवसानंतर सट्टेबाजारही तेजीत आला. विशेष म्हणजे बाजारात सट्टा लावणाऱ्यांचीही संख्याही यावेळी अधिक होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. निवडणूक लागल्यापासून राजकीय वातावरणाने कळस गाठला. कोण बाजी मारणार, यावर शनिवारीही शर्यती, पैजा लागत होत्या. निवडून कोण येणार, त्याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला कोण राहणार, यावरही काही जणांनी शर्यती लावल्या. सट्टेबाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार काही निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात पाच मतदारसंघातून एकूण ७७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यातील मातब्बर उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रविवारी निकालानंतरच विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट होणार आहे. ४पाचही मतदारसंघांमध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झाली. मातब्बर उमेदवारांनी अक्षरश: जिवाचे रान केले. त्यामुळे गेल्या पंधरवाड्यात सर्वत्र वातावरण ढवळून निघाले होते. ४२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत घोषित झाला होता. यंदा त्यापेक्षाही एक तासाने कमी म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी म्हणाले की, सर्वसाधारणपणे सहा-सात तासांमध्ये हा निकाल अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व मतमोजणी प्रक्रियेवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सरासरी दुपारी २ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे.