शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

अमरावती जिल्ह्यातल्या चिखली आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय ...

ठळक मुद्देआजारी असताना पायी चालत गेली गावालाआदिवासींमध्ये संताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणारी प्रीती मागील सहा दिवसांपासून आजारी होती. शनिवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यानंतर ती दोन किलोमीटर अंतरावरील आपल्या गावी पायी गेली. प्रकृती खालावल्याने पालकांनी तिला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शनिवारी रात्री १२ वाजता तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा वर्गशिक्षकांपैकी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल कराप्रीती ही आजारी असतानाही सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच तिची प्रकृती जास्त खालावली आणि मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांसह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे. युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांसह संबंधितांना निवेदन दिले जाणार आहे.

शवविच्छेदन झालेच नाहीउपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना प्रीती मृतावस्थेतच तेथे दाखल झाल्याचे लेखी बयान वडील साबुलाल कासदेकर यांनी दिले. याशिवाय शवविच्छेदन न करण्याचेसुद्धा लिहून दिले. यामुळे शवविच्छेदन न करताच मध्यरात्री २ वाजता प्रीतीचा मृतदेह परिजनांच्या ताब्यात मृतदेह दिला, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हेमंत भिलावेकर यांनी दिली. त्यामुळे प्रीतीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा खुलासा झालेला नाही. हरिसाल येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रीतीला उपजिल्हा रुग्णालयात जिवंतच दाखल करण्यात आले होते. आता मृत्यूचे कारण शोधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरूनच पुन्हा मृतदेह काढून शवविच्छेदन करावे लागणार, हे विशेष.चिखली शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना दु:खद आहे. यासंदर्भात आपण संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल.- राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी