शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृत शेळी पशुधन उपायुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पशुवैद्यकाच्या गैरहजेरीमुळे पशुधन दगावल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने १६ हजार रुपये किमतीची शेळी दगावली. या प्रकाराने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने मृत शेळी अमरावती येथील पशुसंवर्धन सहउपायुक्त राजेंद्र पेठे यांच्या दालनात आणली.रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे. या ठिकाणी असलेल्या शेळ्यांपैकी एक, राजस्थान येथून आणलेली १६ हजार रुपये किमतीची शेळी आजारी पडली. तिच्यावर बेलोरा व चांदूर बाजार येथील पशुदवाखान्यात उपचारासाठी आणले. सदर शेळीची प्रकृती अधिकच खराब झाल्यामुळे पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने शेळी दगावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी अशाप्रकारे उपचाराअभावी गाय दगावली होती. पशुवैद्यकीय मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, याकरिता चार सदस्यीय समिती नेमावी, अशी मागणी रवि पाटील यांनी पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांच्याकडे केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली.मुख्यालयी राहण्याचे आदेशजिल्हाभरातील पशुदवाखान्यामध्ये नियुक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत कळविण्याचे आदेश पशुसंवर्धंन उपायुक्त यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय कुठल्याही पशुधनाची गैरसोय होऊ नये, याकरिताही सक्त ताकीद दिली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी दिली.पशुसंवर्धन विभागाचे सर्वच ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. उलट, घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे.- रवि पाटील, शेतकरी तथा पशुपालक

टॅग्स :Farmerशेतकरी