शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘खाकी’मुळे डेअरिंग; आता १३ जणींच्या हाती पोलिस वाहनांचे स्टिअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 00:04 IST

जिल्हा ग्रामीणमध्ये नऊ, तर शहर पाेलिस आयुक्तालयात चार महिला कर्मचारी रुजू

मनीष तसरे

अमरावती : पोलिस दलातील वाहनांचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यात १३ महिला आता वाहनचालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत. शहर पोलिस मुख्यालयात चार, तर ग्रामीण पोलिस दलात नऊ महिला कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग पूर्ण होऊन या महिला पोलिस दलाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. आतापर्यंत या विभागात पुरुष मंडळीच वाहन चालक म्हणून असायची. आता या महिला चालक झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा आनंदी आहेत.

पहिल्यांदा स्टिअरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का, असेही वाटले. मात्र, आता ट्रेनिंगनंतर भीती, चिंता दूर गेल्या आहेत. आता अवजड आणि लाइटवेट असलेले वाहन या महिला सहजरीत्या चालवित आहेत. प्रत्येकालाच खाकी परिधान करता येत नाही. आम्ही खाकी परिधान करतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले. आता स्वतःचा अभिमान वाटतो, असेही वाहनचालक महिला पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिस दलातील पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील कर्तव्य बाजावावे लागते, असे असले तरी या आधी जिल्हा पोलिस दलात एकही महिला पोलिस वाहनाची चालक म्हणून कार्यरत नव्हती. दरम्यान, पोलिस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे १३ महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपायांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आहे आणि काही तरी वेगळे करायचे आहे, असं चॅलेंज त्यांनी स्वीकारले. यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलिस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला आणि या सर्व महिलांचे खंडाळा येथे चालक प्रशिक्षण केंद्र येथे साडेसात महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत. 

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे अमरावती ग्रामीण व पोलिस आयुक्तालय शहर या सर्व महिला चालक म्हणून खंडाळा येथे साडेसात महिन्यांची कौशल्य चाचणी पार करून पोलिस दलाचा अभिमान वाढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसWomenमहिला