शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५६ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात

By admin | Updated: August 21, 2014 23:33 IST

तालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या

पावसाची दडी : संत्रा, कापूस, सोयाबीन, तुरीवर अवकळासुरेश सवळे - चांदूरबाजारतालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. यंदा खरिपाच्या उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका तालुक्यातील ४३ हजार ५८५ शेतकऱ्यांना बसणार आहे. यावर्षी पावसाला एक महिना उशिराने सुरूवात झाली. त्यामुळे पेरणीचा काळ ३० दिवस पुढे लोटला गेला. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ८ ते २० जुलै या कालावधीत तालुक्यात पेरणीला सुरूवात झाली. पेरणी झालेल्या शेतात नुकतीच बाळ रोपे तयार झाली असतानाच २४ ते २७ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने पिकांना चांगलाच फटका बसला. यातून पिके कशीबशी सावरायला सुरूवात झाली असतानाच २८ जुलैपासून तर आजतागायत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाअभावी पिके व्हेंटीलेटरवर असतानाच अति उष्णतेचा शॉक या बाळ रोपांना बसला. त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेत बदल घडून आला. कमी कालावधीच्या पिकांमध्ये शाखीय वाढ थांबूून प्री-मॅच्युरिटीची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे सोयाबिनचे पीक अकाली फुलोरावर आले आहे. याचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम जाणवणार असल्याची चर्चा सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील २१ हजार ९० हेक्टरवरील खरिपाच्या सोयाबीन पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कपाशीची स्थिती पावसाच्या ताणानंतरही काही प्रमाणात ठीक असली तरी उत्पादनावर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १५ मे ते ३० जूनपर्यंत पेरलेल्या कपाशीपेक्षा जुलै महिन्यात पेरलेल्या कपाशी पिकापासून मिळणारे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. त्यात पावसाने दिलेला ताण व अतिउष्णतामानामुळे खरिपाच्या कोरडवाहू पिकांमध्ये कपाशीच्या फळ-फांद्यांची निर्मितीच झाली नाही. त्यामुळे कपाशीच्या एकूण उत्पादनापैकी शेतकऱ्यांच्या हाती केवळ २५ ते ३० टक्केच उत्पादन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानाच्या बदलाचा ८ हजार हेक्टरवरील संत्रा पिकालासुध्दा फटका बसला असून यंदा संत्रामृग बहर फुटलेलाच नाही. तर आंबिया बहरावर पाण्याच्या ताणाचा व उष्णतेचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात फळांची गळती होत आहे. त्यामुळे संत्रा पिकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. तालुक्यात सर्वात विदारक स्थिती ८ हजार ४०७ हेक्टरवरील तूर पिकांची झालेली आहे. २४ ते २७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मर रोगाची लागण होऊन ८० टक्के पीक अक्षरश: जळून गेले आहे. त्यानंतर पेरलेल्या तुरीला निसर्गाने व वन्यप्राण्यांनी जगूच दिले नाही. उर्वरित तुरीच्या पिकांपासून उत्पादनापेक्षा गुरांच्या वैरणाचीच निर्मिती होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन आणि भाव यात दिलासा देणारे एकमेव तुरीचे पिकही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. मूग, उडीद व इतर पिके पूर्णत: कोमात गेली असून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची आशाच शेतकऱ्यांनी सोेडली आहे.