शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरणे हाऊसफुल्ल, अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने सात मंडळांमध्ये अतिवृष्टी आणली. धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या पाच तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत आहे.अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली. ३२५ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले.

एक जण गेला वाहून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी लखाड-खिराळा मार्गावरील पुलावरून पाय घसरल्याने वाहून गेला. 

तालुकानिहाय बाधित गावांची संख्यातिवसा तालुक्यात २२, भातकुली २३, चांदूर रेल्वे ५, धामणगाव रेल्वे २७, नांदगाव खंडेश्वर ५, मोर्शी ४, वरूड ७, अंजनगाव सुर्जी ८, अचलपूर २, धारणी १, चिखलदरा ५ अशी एकूण १०९ गावे २४ तासांच्या मुसळधार पावसाने बाधित झाली.

१७ जणांचा रेस्क्यू तिवसा तालुक्यातील भिवापूर तलावात अडकलेल्या सहा जणांचा गुरुवारी रेस्क्यू करण्यात आला. एकपाळा येथील त्रिवेणी संगमावर अडकलेल्या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात आले. रायगड प्रकल्पाच्या पाण्यामुळे कोलाड नदीच्या पुरातून पळसखेड, दिघी येथील आठ जणांना बाहेर काढले. 

२७८ घरांचे  नुकसान तिवसा तालुक्यातील ८७, भातकुली ७६, चांदूर रेल्वे १४, धामणगाव रेल्वे १७, नांदगाव खंडेश्वर ५१, मोर्शी ७, वरूड ९, अंजनगाव सुर्जी ९, अचलपूर २, धारणी १ व चिखलदरा ५ अशा २७८ घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, वरूड १, अंजनगाव १ अशी पाच घरे पूर्णत: कोलमडली.

पर्यटकांची उसळली गर्दीधरणाचे दारे केव्हा उघडतात, याची प्रतीक्षा जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील नागरिकांना असते. त्यामुळे १३ दारे उघडण्यात आल्याची वार्ता पसरताच पर्यटक आणि वाहनांची गर्दी सकाळपासून झाली. उपविभागीय अभियंता रमण लायचा, शाखा अभियंता गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी दत्तू फंदे लक्ष ठेवून आहेत. 

नदीकाठावरील गावांना इशारा अप्पर वर्धा धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठी येणाऱ्या गावांना हाय  अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणाचे पाणी नदीत ओसंडून वाहत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण