संदीप मानकर दर्यापूरतालुक्याचे सुपुत्र तथा माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनाची वार्ता त्यांचे जन्मगाव असलेल्या शिक्षणनगरी दारापुरात धडकताच संपुर्ण दारापूर नि:शब्द झाले. त्यांच्या चाहत्यांना अद्यापही ही वार्ता खरी वाटत नव्हती. गेल्या एक महिन्यापासून दादासाहेबांची प्रकृती ही नाजूक होती. त्यांच्या आप्तस्वकीयांकडून गेल्या अनेक दिवसांपासून उलट-सूलट बातम्या येत होत्या. परंतु दादासाहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी त्यांच्या चाहत्यांची परमेश्वराकडे प्रार्थना, याचना चालू होती. परंतु जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, याप्रमाणे शेवटी त्यांच्या चाहत्यांचा या महाननेत्याने शुक्रवारी साथ सोडली. त्यांचे जन्मगाव नि:शब्द झाले. गावातील लहान्यांपासून वयोवृध्दांपर्यंत गावातील कट्ट्यावर बसून सर्वांचेच डोळे पाणावले होते. दारापुरात केजीपासून तर पीजीपर्यंत शिक्षणाची गंगा गोरगरिबांसाठी आणली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. आज दारापुरसारख्या लहान गावात अभियांत्रिकी महाविद्यालयदेखील आहे. दादासाहेबांचीच कार्याची धुरा सांभाळणारे शेकडो शिक्षकांचे, प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे डोळेही या वृत्ताने पाणावले होते.रविवारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कारदारापूर येथे डॉ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २५ एकराचा परिसर आहे. यापैकी १५ एकरमध्ये खुले प्रांगण आहे. २० ते २५ हजार नागरिक उभे राहण्याची या मैदानाची क्षमता आहे. याच परिसरातील मैदानावर माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचा अंत्यसंस्कार रविवारी दुपारी ३ वाजता शासकीय इतमामात पार पडणार आहे. यासाठी ३० बाय २० च्या आकाराचा मोठा ओटा तातडीने तयार करणे सुरू झाले आहे. त्याची उंची तीन फूट आहे. याची जबाबदारी गावातील अब्दुल सलीम या ठेकेदाराकडे देण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली पाहणीअमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी दारापूरला भेट देऊन ज्या ठिकाणी शासकीय इतमात अंत्यसंस्कार पार पडणार आहे, त्या महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियमजवळील मैदानाची पाहाणी केली. रविवारी अंत्यसंस्काराला दाखल होणाऱ्या व्ही.व्ही.आय.पी. संदर्भात काय नियोजन करता येईल यासंदर्भाचा आढावा घेतला. शंभर ते दीडशे पोलिसांचा बंदोबस्त येथे राहाणार आहे.दादासाहेब आमच्या वडिलांप्रमाणे होते.ते वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. ते राज्यपाल असताना केरळला जाण्याचा योग आला. अत्यंत व्यस्त शेड्यूलमधूनसुध्दा त्यांनी आस्थेने विचारपुस केली. त्यांचे माणुसपण अधोरेखित करणारा तो अनुभव होता. -मतीन पटेल, उपसरपंच, दारापूरदादासाहेबांनी दारापूरच्या विकासात शंभरटक्के योगदान दिले. त्यांच्यामुळेच गरिबांच्या मुलाला शिक्षण मिळत आहे. त्यांना आम्ही जे मागितले ते-ते त्यांनी गावासाठी दिले. -कल्पना बेलोकार, पं.स.सदस्य, दारापूरदादासाहेबांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. जेव्हा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेव्हलच्या अचिव्हमेंट केल्या तेव्हा नेहमीच त्यांनी कौतुकाची थाप आमच्या पाठिवर ठेवली.-डॉ. एस.एम. खेरडे, प्राचार्य, दारापूर दादासाहेबांशी माझा दोस्ताना होता. दिवाळीला आम्ही एकमेकांच्या घरी जात होतो. सोबत शिकलो. त्यांच्या निधनाची वार्ता कळली. गावचा देवच हरविला आहे. -बापुराव येवले, वयोवृध्द नागरिकदेवालय बांधले, रस्ते केले लहानशा गावात शिक्षणाची गंगा आणली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अनेक नेते घडले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली. -गौतमराव गवई, नागरिक, दारापूर अमरावतीही सुन्नदादासाहेब गवई यांच्या जाण्याची वार्ता दुपारी १ च्या सुमारास अमरावतीत धडकली नि अवघी अंबानगरी सुन्न झाली. दादासाहेब आणि कमलताई यांनी मिळून उभारलेल्या ‘कमलकृष्ण’ या त्यांच्या काँग्रेसनगर मार्गावरील निवासस्थानासमोर दुपारपासूनच चाहत्यांची गर्दी होऊ लागली. दादासाहेबांचे पार्थिव कधी येणार यासाठी प्रत्येकाकरवी चौकशी सुरू होती. ‘कमलकृष्ण’समोरील रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतला होता. पोलिसांचा ताफा दादासाहेबांच्या निवासस्थानासमोर तैनात झाला होता. सायंकाळी ७ वाजेपर्यंत निवासस्थानासमोर मोठी गर्दी एकवटली. अनेकांना अश्रु आवरत नव्हते. नागपुरातून ६.३० च्या सुमारास निघालेले पार्थिव ९ वाजेपर्यंत पोहचायचे होते. अमरावतीत पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले.
नि:शब्द झाले दादासाहेबांचे दारापूर
By admin | Updated: July 26, 2015 00:35 IST