शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

सिलिंडरचा स्फोट, आठ घरे बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:02 IST

येथील आठवडीबाजार परिसरातील आठ घरांना आग लागून राखरांगोळी झाली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता सिलिंडरचा स्फोटामुळे एका घराला आग लागली.

लाखोंची हानी : परतवाड्याच्या आठवडी बाजारातील घटना, महिलांचा आक्रोशपरतवाडा : येथील आठवडीबाजार परिसरातील आठ घरांना आग लागून राखरांगोळी झाली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता सिलिंडरचा स्फोटामुळे एका घराला आग लागली. त्यातील सिलिंडरचा स्पोट झाल्याने इतर घरांना आग लागली. दोन अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. संपूर्ण आयुष्याची पुंजी व संसार उद्ध्वस्त झाल्याने महिलांचा घटनास्थळी आक्रोश सुरू होता. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी प्रभाग आठवडी बाजारात सुनील उमरकर यांच्या घराला सर्वप्रथम आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कुळामातीच्या या घराने शॉट सर्किटमुळे पेट घेताच घरातील कपडे, बिस्तरे व लाकडी साहित्य जळाले. त्यातच सिलिंडरचा स्पोट झाल्याने लागून असलेल्या इतर घरांना आगीने कवेत घेतले. तुळशीराम कदम, सुनीता भगवानसिंग मोरले, अनिल उमरकर, आकाश उमरकर, नानीबाई उमरकर, नंदू हटेल, संजय डोंगरे, मनोज नागले आदींच्या घरांची राखरांगोळी झाली. या आठ घरांमध्ये तब्बल ४३ सदस्य राहत होते. मात्र या आगीत कुठलीच जीवित हानी झाली नाही. शहरात सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या आठवडी बाजारात घरांना आग लागल्यावर सिलिंडरचा स्पोट होताच भाजी व मटन, चिकन विक्रेत्यांसह उपस्थित ग्राहकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. आठवडी बाजारात स्मशान शांतता पसरली होती. महिलांचा आक्रोश आपल्या डोळ्यादेखत आयुष्याची पुंजी पूर्णत: राखरांगोळी झाल्याने महिला व मुलींनी एकच हंबरडा फोडला. घरातील काही सामान वाचविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. मात्र आग एवढी भीषण होत की काहीच त्या वाचवू शकल्या नाही. रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कपडे, बिस्तरे, अन्न, धान्य आदी सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. आग लागताच घरातील लहान मुलांना प्रथम परिसरातील नागरिकांनी बाहेर काढल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अचलपूर नगरपरिषदेच्या दोन अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली गेली. विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. घटनास्थळी अनिल तायडे, प्रदीप तायडे, राधे शर्मा, गणेश नंदवंशी, दीपक गणेशे, बापूराव धंदर, रुपेश लहाणे, सागर वाटाणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. ठाणेदार किरण वानखडे व तहसील प्रशासनाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. सावळी येथे एका घराची राखरांगोळीपरतवाडा शहराला लागून असलेल्या सावळी दातूरा येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता चिरोंजीलाल काचोळे यांच्या घराला आग लागून घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली. आग लागल्यानंतर अचलपूर येथील अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने विझविण्यात आली. नागरिकांना आग दिसताच त्यांनी हातात मिळेल त्याने पाणी टाकून आग विझविली.