शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

'केबल वॉर'मुळे ग्राहकांनाच मन:स्ताप

By admin | Updated: March 29, 2016 00:15 IST

विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत.

एकमेकांचे केबल तोडले : क्रिकेट सामन्याच्या दिवशीच प्रक्षेपण बंदअमरावती : विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलियात झालेल्या सामन्यादरम्यान शहरात केबल वॉरचा प्रकार उघड झाला असून केबल प्रक्षेपण बंद झाल्याने ग्राहकांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात केबल व्यवसाय करणाऱ्या तीन कंपन्या विविध परिसरात केबलचे जाळे पसरवीत आहेत. प्रत्येक परिसरात तिन्ही कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचे काम करीत असून एकमेकांचे केबल तोडून टीव्हीवरील प्रक्षेपण बंद करण्याचे प्रकार करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅच दरम्यान शहरातील तब्बल १०० ते १२० ठिकाणी केबल तोडण्यात आल्याने खळबळ उडाली. केबल तोडल्यामुळे शहरातील बहुतांश केबल ग्राहकांच्या घरचे टीव्ही संच अचानक बंद पडले. केबल अचानक बंद झाल्यामुळे केबल आॅपरेटरांनी फॉल्ट शोधण्याची धावपळ सुरू केली. यामध्ये काही जणांचा रंगेहातसुध्दा पकडले आहे. मात्र, हा प्रकारावरून वादविवाद सुध्दा झाले. त्यामुळे केबल वॉरमुळे हाणामारीचे प्रकारसुध्दा तसेच विरुद्ध कंपनीचे कर्मचारी हल्लेसुध्दा करीत असल्याची ओरड केबल चालकांची आहे. रविवारी राजकमल उड्डान पुल्यावरून गेलेले केबल तोडण्यात आले होते. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावरील बहुतांश केबल प्रक्षेपण बंद झाले होते. केबल बंदचा सर्वाधिक फटका ग्राहकांनाच सहन करावा लागत असल्याचे आढळले.यासंदर्भात केबल चालकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारीसुध्दा नोंदविल्यात. हे केबल वॉर असेच सुरू राहिल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बच्चू कडू पोहोचले सीपींच्या दालनातशहरातील केबल वॉरची स्थिती पाहता एका कंपनीच्या केबलचालकाने आमदार बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतली. त्यांची रास्त बाजू ऐकून आ.बच्चू कडू यांनी तत्काळ दखल घेत रविवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. त्यांच्या समक्ष केबल तोडण्याचा प्रकार त्यांनी सांगितला. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी आ.कडू यांना दिले आहे. ३१ मार्चला अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होणारशासनाने सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ डिसेंबर डेडलाईन दिली होती. त्याच दिवशी अ‍ॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आले होते. मात्र, अंतिम तारखेपर्यंत बहूतांश केबल आॅपेरटरांनी ग्राहकांच्या घरी सेटटॉप बसविले नव्हते. त्यामुळे काही केबल चालकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार अ‍ॅनालॉग सिग्नल सुरु ठेवण्याला मुदतवाढ मिळाली होती. आता ती मुदत ३१ मार्च रोजी संपणार असून अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होण्याची शक्यता आहे. शहरातील काही ठिकाणी केबल तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबद्दल उपायुक्तांकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्यासंदर्भाने आ.बच्चू कडू हे भेटायला आले होते. याप्रकाराची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढू. - दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त.