शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत शिथिलता, आजपासून सर्व दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत काही शिथिलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत काही शिथिलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, कोरोनाची साथ वाढू नये, म्हणून सर्वांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेव्हिअर’चे पालन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. ते न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिला.

संचारबंदीत शिथिलता आणून दुकानांना परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जारी केला. या आदेशाचे पालन शनिवार, ६ मार्चपासून सकाळी ६ वाजतापासून अमरावती महापालिका क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण क्षेत्रात लागू होईल. आरोग्य, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आदी अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू राहतील. इतर शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात, असे आदेश आहेत.

------------------

- तर पाच दिवस दुकाने होणार सील

सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझर आदी आवश्यक दक्षतेचे नियम दुकानदारांकडून पाळले जात नसतील, तर पाच दिवस दुकान सील व आठ हजार रुपये दंड संबंधितांवर ठोठावण्यात येणार आहे. त्यासाठी दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी तपासण्यात येणार आहे. सर्व दुकाने, आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

---------------------

दुकानात ‘नो मास्क- नो एन्ट्री’चे पालन व्हावे

‘नो मास्क- नो एन्ट्री’ पद्धत राबविणे दुकानांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसे फलकही प्रत्येक ठिकाणी लावण्याचे निर्देश आहेत. ग्राहकांनीही खरेदीसाठी घराजवळच्या दुकानांची निवड करून लांबचा प्रवास शक्यतो टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

-------------------

लॉजिंग २५ टक्क्यांच्या क्षमतेत; उपहारगृहांना पार्सलची परवानगी

लॉजिंग व्यावसायिकांना त्यांच्या क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत व्यवसाय चालवता येईल. मात्र, ग्राहकांना त्यांच्या कक्षात जेवणाची व्यवस्था करावी. खाद्यपदार्थ सीलबंद असावेत. नियमभंग केल्यास लॉजला पाच दिवस सील व १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स, खाद्यगृहे प्रत्यक्ष सुरू न ठेवता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार्सल सुविधा पुरवू शकतील.

--------------------

लग्न समारंभात २० व्यक्तींना परवानगी

लग्न समारंभासाठी केवळ २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. मात्र, या व्यक्तींनी शक्यतो ‘अँटिजेन टेस्ट’ करून घेण्याच्या सूचना आहेत. वधु किंवा वर यांचे घर किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करता येईल. तिथे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर न झाल्यास आयोजकाला २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यासाठी महापालिका क्षेत्रात आयुक्त, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना व इतर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

--------------------------

- मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. तथापि, चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त ३ प्रवासी, तर तीनचाकी गाडीत (ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे.

- ठोक भाजीमंडईत पहाटे २ ते सकाळी ६ या कालावधीत व्यवहार होतील, मात्र, तिथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

---------

हे असेल बंद

महापालिका तसेच इतर शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस, सर्व चित्रपटगृहे व बहुविध चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरणतलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील.

-----------------