शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मशागत; पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या ..

शेतकरी व्यस्त : बियाण्यांचे नवनवीन वाण बाजारातचांदूरबाजार : यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी मशागत आटोपली आहे तर काहींची शेवटच्या टप्प्यात असून बियाण्यांचीही तजवीज झाली आहे. आता वाट आहे केवळ पावसाची.ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मजुरीचे दर वधारले असून मजूरसुद्धा मिळत नसल्याने बाहेरून आणून अपूर्ण असलेली मशागतीची कामे शेतकरी आटोपत आहेत. यातच बाजारात विक्रीसाठी आलेल्या बियाण्यांच्या नवनवीन वाणांमुळे शेतकरी गोंधळात सापडला आहे. रबीचा हंगाम संपल्यानंतर लगेच शेतीतील मशागतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. शेतातील फण-पऱ्हाट्या वेचणे आणि जाळणे ही कामेसुद्धा पूर्णत्वास गेली आहे. सतत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना लाभत नसल्यामुळे यावर्षीही शेतात पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. रबी हंगामसुद्धा आता संपला असल्याने पुढील पेरणीसाठी तालुक्यातील बळीराजा पुन्हा सज्ज झाला आहे. पावसाळा अगदी चार वर येऊन ठेपला असताना शेती पेरणीयोग्य करण्यास सुरवात झाली आहे. शेतातील काडीकचरा पेटवून शेत स्वच्छ करण्याची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. तालुक्यात जवळपास मशागतीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. आता बी-बियाण्यांसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झालेली आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी शेतातील कामे हाती घेतले आहे. सकाळी ५ वाजताच शेतीच्या कामाला प्रारंभ होत आहे. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे काम करणे शक्य नसल्याने शेतात पहाटेपासून नांगरणी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडीची व्यवस्था आहे त्यांनी अंतिम टप्प्यातील मशागत घरीच चालू केली आहे. दरवर्षी होणाऱ्या नापिकीमुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यावर्षी शेत लागवणीला देणे जरी जोरात असले तरी येणाऱ्या व्यक्ती संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत लागवणीला यावर्षी कमी भावाने लागवणीवर शेत देण्यास शेतकरी तयार झाला आहे.ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशा शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेतात शेणखत टाकायला सुरुवात केली आहे. तसेच बी-बियाणे खताची खरेदी करून आपल्या गावी गोदामात नेत आहेत. पण आर्थिक परिस्थिती नसणारे शेतकरी आजही कर्जाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)आंध्रच्या कंपन्यांचा बाजारात बोलबालाबियाणे बाजारात नवनवीन कंपन्यांनी आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न चालविला असला तरीही आंध्रप्रदेशातील बियाणे कंपन्यांचा बाजारात बोलबाला सुरु आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहे. काही ठिकाणी मशागत अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी यंदा भरघोस पीक घेण्याच्या अपेक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उसणवार करुन बियाणे खरेदीसाठी लगबग चालविली आहे. ग्रामीण भागातही बियाण्यांबाबत जाहीरातयुध्द सुरु आहे.