शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

मशागत; पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या ..

शेतकरी व्यस्त : बियाण्यांचे नवनवीन वाण बाजारातचांदूरबाजार : यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी मशागत आटोपली आहे तर काहींची शेवटच्या टप्प्यात असून बियाण्यांचीही तजवीज झाली आहे. आता वाट आहे केवळ पावसाची.ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मजुरीचे दर वधारले असून मजूरसुद्धा मिळत नसल्याने बाहेरून आणून अपूर्ण असलेली मशागतीची कामे शेतकरी आटोपत आहेत. यातच बाजारात विक्रीसाठी आलेल्या बियाण्यांच्या नवनवीन वाणांमुळे शेतकरी गोंधळात सापडला आहे. रबीचा हंगाम संपल्यानंतर लगेच शेतीतील मशागतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. शेतातील फण-पऱ्हाट्या वेचणे आणि जाळणे ही कामेसुद्धा पूर्णत्वास गेली आहे. सतत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना लाभत नसल्यामुळे यावर्षीही शेतात पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. रबी हंगामसुद्धा आता संपला असल्याने पुढील पेरणीसाठी तालुक्यातील बळीराजा पुन्हा सज्ज झाला आहे. पावसाळा अगदी चार वर येऊन ठेपला असताना शेती पेरणीयोग्य करण्यास सुरवात झाली आहे. शेतातील काडीकचरा पेटवून शेत स्वच्छ करण्याची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. तालुक्यात जवळपास मशागतीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. आता बी-बियाण्यांसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झालेली आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी शेतातील कामे हाती घेतले आहे. सकाळी ५ वाजताच शेतीच्या कामाला प्रारंभ होत आहे. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे काम करणे शक्य नसल्याने शेतात पहाटेपासून नांगरणी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडीची व्यवस्था आहे त्यांनी अंतिम टप्प्यातील मशागत घरीच चालू केली आहे. दरवर्षी होणाऱ्या नापिकीमुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यावर्षी शेत लागवणीला देणे जरी जोरात असले तरी येणाऱ्या व्यक्ती संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत लागवणीला यावर्षी कमी भावाने लागवणीवर शेत देण्यास शेतकरी तयार झाला आहे.ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशा शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेतात शेणखत टाकायला सुरुवात केली आहे. तसेच बी-बियाणे खताची खरेदी करून आपल्या गावी गोदामात नेत आहेत. पण आर्थिक परिस्थिती नसणारे शेतकरी आजही कर्जाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)आंध्रच्या कंपन्यांचा बाजारात बोलबालाबियाणे बाजारात नवनवीन कंपन्यांनी आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न चालविला असला तरीही आंध्रप्रदेशातील बियाणे कंपन्यांचा बाजारात बोलबाला सुरु आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहे. काही ठिकाणी मशागत अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी यंदा भरघोस पीक घेण्याच्या अपेक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उसणवार करुन बियाणे खरेदीसाठी लगबग चालविली आहे. ग्रामीण भागातही बियाण्यांबाबत जाहीरातयुध्द सुरु आहे.