शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:34 IST

नजीकच्या माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले.

बेनोडा शहीद (अमरावती) : वरूड तालुक्यातील माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांचा मंगळवारी सकाळी कमी रक्तदाबामुळे काश्मीर येथे कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. गुरुवारी माणिकपूर या गावी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.काश्मीर येथे कर्तव्यावर असताना रक्तदाब कमी होऊन त्यांना हृद्याघात झाल्याच्या माहितीस मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी दुजोरा दिला. नागपूर मुख्यालयांतर्गत सीआरपीएफच्या सेकंड बटालियनमध्ये त्यांनी सुकमा येथे सेवा दिली. त्यांची नुकतीच तेथून काश्मीरमध्ये बदली झाली होती. दोन वर्षांनी त्यांच्या सेवेचा बाँड संपणार होता. वरूड येथे त्यांनी नुकतेच घर घेतले होते. गृहप्रवेशापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. एकूण चार भावांपैकी पंजाब उईके यांचा क्रमांक दुसरा आहे. त्यांच्या पश्चात आई रखमाबाई (७०), तीन भाऊ, पत्नी चंद्रा (४२), नववीत शिकणारा मुलगा व पाचवीत शिकणारी मुलगी आहे. मितभाषी असलेले पंजाब उईके यांचा माणिकपूर परिसरात चांगला संपर्क होता. गावी आल्यानंतर वॉटर कप स्पर्धेसारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांचे पार्थिव ३० जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास वरूडला आणले जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर