शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पीक विम्याने पाणी फेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:12 IST

पान २ चे लिड नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील २५ हजार ३६ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी २८ हजार ...

पान २ चे लिड

नांदगाव खंडेश्वर :

तालुक्यातील २५ हजार ३६ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी २८ हजार ३३० हेक्टर सोयाबीन पिकासाठी २ कोटी २६ लाख ६४ हजार ६४५ रुपयांचा पीक विमा हप्ता भरला होता. ज्या लोकांनी सोयाबीन काढण्याच्या वेळी पावसाने नुकसान झाले, अशा फक्त २६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यांनाच फक्त ३० लाख ५४ हजार ४०४ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.

मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळी सततच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले होते. तोंडाशी आलेले पीक काढणीच्या वेळी सततच्या पावसाने मातीत घातले. कित्येकाचे सोयाबीन कुजले. कवडीमोल भावाने बाजारात विकावे लागले होते. शेती मशागतीचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. कित्येक शेतकरी शेतात दिवसभर राबतात त्यांनी तक्रारी कुठे व कशा कराव्यात, याचीही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. पीक विमा काढला की आपण मोकळे झालो, नुकसान झाल्यास मदत मिळणारच, या आशेवर शेतकरी असतात. पेरणी ते कापणी दरम्यान झालेल्या नुकसानाची तक्रार केली नाही एवढाच त्यांचा दोष असेल, तर त्याबाबत जनजागृती होणेही गरजेचे आहे.

मागील हंगामात तालुक्यातील ७८३ शेतकऱ्यांनी ४६७ हेक्टर मूग पिकाचा विमा काढला होता. त्यांना मात्र ४६ लाख ३४ हजार ४३० रुपये विमा मंजूर झाला. २५५ शेतकऱ्यांनी १४३.७६ हेक्टर उडीद पिकाचा विमा काढला होता. त्यांना १४ लाख ५५ हजार १५६ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.

कपाशी पिकासाठी ३ हजार १७७ शेतकऱ्यांनी २ हजार ५३८ हेक्‍टर क्षेत्रासाठी विमा काढला होता. यापैकी फक्त १०६७ शेतकऱ्यांना ३५ लाख ४३ हजार ३८१ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. अद्यापही सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील वर्षी पीक काढणीच्या वेळी झालेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा विमा मिळणार, या आशेवर आहेत.

------------------

गतवर्षी खरबी गुंड शिवारात कुटुंबातील असलेल्या एकूण १६ एकर क्षेत्रासाठी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. कापणीच्या वेळी सतत पाऊस आल्याने सोयाबीन कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण, पीक विमा अद्याप मिळाला नाही.

- जीविता विनोद जगताप, सरपंच, वाघोडा

------------

माहुली चोर शिवारातील चार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा गतवर्षी विमा काढला होता. कापणीच्या वेळी भरपूर पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. उत्पादनातही घट झाली. तरीही पीक विमा मिळाला नाही.

- राजेंद्र सरोदे, शेतकरी, माहुली चोर

------------------

कोठोडा शिवारातील पाच एकर सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण, पीक विमा मिळाला नाही.

- नितीन इंगोले, शेतकरी, कोठोडा