वनोजा बाग : फेब्रुवारी महिना उलटत असताना अद्यापही पीकविमा मिळाला नसल्याने शेतकºयांना नियमानुसार १२ टक्के विलंबशुल्कासह नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी अंजनगांव तालुका प्रहारचे वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकºयांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मुग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकांचा विमा काढलेला होता. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला, त्या शेतकऱ्यांना २९ जून २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे मूग, उडीद पिकांची नुकसानाची आकडेवारी १५ नोव्हेंबर २०२० ला व सोयाबीनची आकडेवारी ३१ जानेवारी २०२१ ला जाहीर करुन तीन आठवड्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक होते. मात्र पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे ठरलेल्या कालावधीत शेतकºयांना नुकसानभरपाई न दिल्यास १२ टक्के विलंब शुल्क विमा कंपनीने शेतकºयांना द्यावे, अशी मागणी प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रदीप निमकाळे, सनी शळके, अरुण शेवाने, गोपाल गावनेर, राजू पडोळे, अवि टाक, छोटू अढाऊ, ऋषिकेश वाघमारे, मनोज पुरी, अब्दुल जमिल, अश्विन देशमुख, निवृत्ती गळसकर, राजेश ढोक, निखिल कडू, रणजित इंगळे, जीवन कात्रे, अवि ढोरे, सुजित काठोळे, शुभम निमकाळे, अंकुश पाचघरे उपस्थित होते.