शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप ...

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप २०२० च्या हंगामात कंपनीकडे १,८५,६०१ शेतकऱ्यांचा १०९ कोटी ४१ लाख ९७ हजार ८२२ रुपयांचा प्रीमियमचा भरणा करण्यात आला होता. पिकांच्या प्रतिकूल परिस्थितीतही विमा कंपनीद्वारा फक्त ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी ६३ लाख ३२ हजार ०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ४६,८७,८६,७९५ असे एकूण १०९,४१,९७,८२२ रुपयांचा प्रिमियम कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. कंपनीद्वारा मात्र, ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२,६३,३२,०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

मागच्या हंगामात सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सारखी अल्पावधीतील पिके बाद झाली होती. त्यानंतर ऑगस्टपासून पावसाने रिपरीप लावली ती नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले. याशिवाय गंजीदेखील पावसाने खराब झाल्या. संपूर्ण सोयाबीनचे पीक उद्ध्वद्वस्त झाले. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाला बुरशीजन्य रोगामुळे बोंडसड झाली. गुलाबी बोंडअळीनेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली. या नुकसानाकरिता शासनाद्वारा ३,१४,८७० हेक्टर पिकासाठी ३३७.०६ कोटींची भरपाई देण्यात आली. कंपनीद्वारा मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

बॉक्स

असा मिळाला पीक विमा (हेक्टर/रुपये)

पिकाचे नाव प्रीमियम भरणा शेतकरी पात्र भरपाई

उडीद २,७७,११,९०८ ५,८०२ ५,२१,९१०४९

मूग ७,९२,७६,१७० १९,२६९ ३४,३६,५९,९६३

तूर ६,१५,५०,७२४ २,५३० ७८,६३,१५५

ज्वारी १९,२५,६२३ ५६ १,९५,८९२

धान २,१६,४३२ ४ १५,७३९

कपाशी १६,५०,२२,०६३ २,६१२ १ ३७,०६,०४८

सोयाबीन ७५,८४,९४,९०२ १९,६६४ २०,८७,००,१६६

बॉक्स

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांना ३.१८ कोटी

परतीच्या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्या करीता ३,५९८ शेतकऱ्यांना ३,१८,९९,०३१ रुपयांची भरपाई देण्यात आालेली आहे. यामध्ये कपाशीसाठी फक्त ३३८ शेतकऱ्यांना २५,०७,२५५ रुपये तर सोयाबीनसाठी २,५२६ शेतकऱ्यांना२,६८,७५,६०९ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. याशिवाय उडदाला ३,८९,९८० व मुंगासाठी १२,४२,३३३ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

बॉक्स

काढणीपश्चात नुकसान, ७०२ शेतकऱ्यांना भरपाई

पिकाच्या संवगणीनंतर परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. यात ६९४ शेतकऱ्यांना १,१४,३६,२७५ रुपयांची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आलेली आहे. याशिवाय कपाशीसाठी सहा शेतकऱ्यांना ३३,२५३, धानासाठी एका शेतकऱ्याला ९,१५१ रुपये याशिवाय तुरीसाठी एका शेतकऱ्याला ६,६४० रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

बॉक्स

अशी आहे. तालुकानिहाय भरपाई

अचलपूर तालुक्यात ७५,७८,३२५ रुपये, अमरावती १,५६,९७,४७२ रुपये, अंजनगाव सुर्जी ४ १४,००,२८९ रुपये, भातकुली २,०३,९७,१४२ रुपये, चांदूर रेल्वे २,३६,७८,१८१ रुपये, चांदूरबाजार २,१९,१०,२०९ रुपये, चिखलदरा ३६,८९,७७८, दर्यापूर ३२,९८,८६,८५१ रुपये, धामणगाव १ ९०,३१,७६१ रुपये, धारणी १,०४,६४,८४६ रुपये, मोर्शी ७ २२,४३,९६३ रुपये, नांदगाव १,२७,९४,४९८ रुपये, तिवसा ३,८२,४६,९३३ रुपये व वरूड तालुक्यात ९३,११,७९४ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

बॉक्स

पीक विम्यात बीड पॅटर्न कोठे?

पीक विम्याच्या भरपाईत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे बीड जिल्ह्याचा पॅटर्न राबविण्याची विनंती केल्याचे कृत्रिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असताना सांगितले होते. यात १० प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन कंपनीद्वारा ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, प्रत्यक्षात मात्र, असे काहीही झालेले नाही.