शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पुरवठादार, कंत्राटदारांविरुद्ध फौजदारीचे आदेश

By admin | Updated: October 11, 2016 00:07 IST

आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांची विदारक स्थिती असून कंत्राटदार दर्जाहीन भोजनपुरवठा करीत असल्याचे छायाचित्रण खुद्द पालकमंत्र्यांनी ‘टॅब’च्या माध्यमातून अधिकाऱ्यांना दाखविले.

पालकमंत्री गरजले : आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणीअमरावती : आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांची विदारक स्थिती असून कंत्राटदार दर्जाहीन भोजनपुरवठा करीत असल्याचे छायाचित्रण खुद्द पालकमंत्र्यांनी ‘टॅब’च्या माध्यमातून अधिकाऱ्यांना दाखविले. याप्रकरणाची चौकशी करून भोजनकंत्राट रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ना. पोटे यांनी आदिवासी विकास विभागाच्या कारभाराची अक्षरश: चिरफाड करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी अपर आयुक्त गिरीश सरोदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे प्रकल्प अधिकारी षण्मुगराजन, वित्त अधिकारी किशोर गुल्हाने यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व महावितरणचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा व वसतिगृह बांधकामाची सद्य:स्थिती, आश्रमशाळा, वसतिगृहातील भोजनाचा दर्जा व कंत्राट यासंबंधी माहिती जाणून घेतली. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा हा अधिकारी कधी तपासतात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये भोजन चांगले मिळत नाही, तसेच निवासाची सुुविधा चांगली नसल्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रात येत आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन निकृष्ट भोजन विद्यार्थ्यांना पुरविणाऱ्या कंत्राटदारांवर तातडीने पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्यात. आदिवासी विद्यार्थी अतिदुर्गम भागातून शहरात शिक्षणासाठी येतो. येथे त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर आदिवासी समाज कधीच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकास अभियानांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबधीची सद्य:स्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. कौशल्य विकास अभियानांतर्गत आदिवासी विभागाकडून नियुक्त खासगी संस्थेव्दारे एकूण आठ कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षित होऊन त्याला रोजगार मिळावा, हा यामागचा हेतू आहे, असे ना. पोटे यांनी सांगितले. विभागाने चांगल्या संस्थांची निवड करुन अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आदिवासी विकास विभागाने व महावितरणने ग्रामीण भागातील आदिवासी गावांमध्ये पथदिवे लावून तेथील अंधार दूर सारावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनंच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही अधिकारी कुचराई करीत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, अशी तंबी पालकमंत्र्यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ३० आश्रमशाळा, वसतिगृहांची निर्मिती होणारप्रस्तावित नवसारी व रहाटगाव येथील मुला-मुलींचे वसतिगृहबांधणीचे काम प्रगतीपथावर असून आगामी प्रथम सत्रापासून या वसतिगृहांच्या इमारती वापरण्यास सज्ज होतील. ही वसतिगृहे एक हजार विद्यार्थीक्षमतेची आहेत. परतवाडा, अचलपूर येथे चार वसतिगृहांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच जिल्ह्यात ३० आश्रमशाळा व वसतिगृह निर्माण करण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाव्दारे शासनाला सादर करण्यात आला आहे. चिखलदरा येथे मुलींच्या वसतिगृह बांधकामाचे काम सुरु असून आगामी शैक्षणिक सत्रापासून ते राहण्यायोग्य होईल. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण १८ वसतिगृहे आहेत. त्यापैकी चार शासकीय वसतिगृहे शासकीय तर उर्वरित १४ वसतिगृहे ही खासगी इमारतींमध्ये सुरु आहेत. यामध्ये सुमारे २,९३३ विद्यार्थी राहात असल्याची माहिती अपर आयुक्त गिरीश सरोदे आणि प्रकल्प अधिकारी षण्मुगराजन यांनी बैठकीत दिली.