शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सत्यशोधक साहित्यातून सृजनशील जीवनदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:50 IST

राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे.

ठळक मुद्देदुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे उद्घाटन : अनेक विचारवंतांची हजेरी

आॅनलाईन लोकमतवरूड : राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे. या विचारप्ीाठाचे औचित्य आहे दुसऱ्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे. या समेलनाच्या उद्घाटनाला सत्यशोधक साहित्य जीवनदृष्टी देते, ही दृष्टी विध्वंसक नसून सृजनशिल आहे, असे मत विचारवंतांनी उद्घाटनप्रसंगी नोंदविले.सत्यशोधक फाउंडेशनच्यावतीने दुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे होते. विचारपीठाचे स्वागताध्यक्ष मनोहर आंडे, अशोक बोडखे, बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा परिचदेचे समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, विक्रम ठाकरे, अंजनगावचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार आशिष बिजवल उपस्थित होते. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची देवाण-घेवाण करून बहुजन समाजाला नवी दिशा देणे गरजेचे असल्याचे मत या संमेलनात व्यक्त करण्यात आले.अध्यक्षस्थानावरून चंद्रकांत वानखडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत त्यांनी शासनावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सत्यशाोधक साहित्य संमेलनामध्ये बदलत्या परिस्थीतीवर चर्चा करून संवाद घडावा. नवीन विषयाला स्वीकारताना स्वत:मध्ये काय बदल करावा, याचे आत्मपरीक्षण बहुजन समाजाने करणे गरजेचे आहे. जो समाज चिकित्सा करतो, आत्मपरीक्षण करतो तोच दोषमुक्त होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले.साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात मुंबई येथील सचिन परब, यवतमाळचे इतिहास संशोधक अशोक राणा यांनी विचार मांडले. दुसºया सत्रात अमरावतीचे डॉ. गणेश हलकारे व अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी विचार मांडले. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, जगदीश काळे, प्रवीण चौधरी, विनय फरकाडे, दिलीप भोयर, किशोर भगत, महेंद्र भातकुले, नितीन खेरडे आदी उपस्थित होते.