शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

By admin | Updated: April 22, 2017 00:25 IST

अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो

अमरावती : अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशी ही वसुंधरा ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अर्धे आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढले आहे. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाच्या या ग्रहावर फक्त जीवसृष्टी आहे. १९७० साली सर्वप्रथम सॅनफ्रॉन्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिवसाचे जनक होय. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने तो थंड झाला व त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे. दरवर्षी पृथ्वीला सुमारे १० लाख भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील काही सूक्ष्म असतात. सन २००४ मध्ये झालेल्या त्सूनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग ३ मायक्रोसेकंद कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चाललेला आहे. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमीटर ओढली जात आहे. दरवर्षाला चंद्र सुद्धा पृथ्वीपासून ३.८ सें. मी. लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिलीसेकंदाने मोठा होईल. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयॉर्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सें. मी. दूर जात आहे. पृथ्वीचे तापमान वाढत चाललेले आहे. पृथ्वीचा समतोल ढासळत चाललेला आहे. हे तापमान असेच जर वाढले तर भविष्यात मनुष्य व इतर जीवसृष्टी नष्ट होईल, पृथ्वीला आणखी एक मोठा धोका म्हणजे भविष्यात "स्वीप्टटटल" या अवाढव्य धूमकेतूची पृथ्वीशी टक्कर होईल, यामुळेसुद्धा पृथ्वीच्या बऱ्याच भागाची हानी होईल. २१ जुलै १९९४ रोजी शुमेकरलेव्ही या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. या वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे जरूरी आहे. नाही, तर ही वसुंधरा आपल्याला कधीच माफ करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी विद्यार्थ्यांनी पृथ्वीला वाचविण्यासाठी कोणतातरी एक चांगला संकल्प करावा व तो प्रत्यक्षात आचरणात आणावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.