शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

By admin | Updated: April 22, 2017 00:25 IST

अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो

अमरावती : अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशी ही वसुंधरा ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अर्धे आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढले आहे. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाच्या या ग्रहावर फक्त जीवसृष्टी आहे. १९७० साली सर्वप्रथम सॅनफ्रॉन्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिवसाचे जनक होय. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने तो थंड झाला व त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे. दरवर्षी पृथ्वीला सुमारे १० लाख भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील काही सूक्ष्म असतात. सन २००४ मध्ये झालेल्या त्सूनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग ३ मायक्रोसेकंद कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चाललेला आहे. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमीटर ओढली जात आहे. दरवर्षाला चंद्र सुद्धा पृथ्वीपासून ३.८ सें. मी. लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिलीसेकंदाने मोठा होईल. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयॉर्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सें. मी. दूर जात आहे. पृथ्वीचे तापमान वाढत चाललेले आहे. पृथ्वीचा समतोल ढासळत चाललेला आहे. हे तापमान असेच जर वाढले तर भविष्यात मनुष्य व इतर जीवसृष्टी नष्ट होईल, पृथ्वीला आणखी एक मोठा धोका म्हणजे भविष्यात "स्वीप्टटटल" या अवाढव्य धूमकेतूची पृथ्वीशी टक्कर होईल, यामुळेसुद्धा पृथ्वीच्या बऱ्याच भागाची हानी होईल. २१ जुलै १९९४ रोजी शुमेकरलेव्ही या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. या वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे जरूरी आहे. नाही, तर ही वसुंधरा आपल्याला कधीच माफ करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी विद्यार्थ्यांनी पृथ्वीला वाचविण्यासाठी कोणतातरी एक चांगला संकल्प करावा व तो प्रत्यक्षात आचरणात आणावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.