शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वन विभागात नवख्या ‘आरएफओं’ना क्रीम पोस्टिंग

By गणेश वासनिक | Updated: February 22, 2025 13:34 IST

Amravati : परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी विशेष सोय; आठ महिने ठेवलीत पद रिक्त, अर्थकारणाचा करिष्मा

अमरावती : राज्याच्या वन विभागात अंदाधुंद कारभार सुरू असून, महत्त्वाची पदे आठ महिने रिक्त ठेवल्यानंतर नवख्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अनुभव नसताना महत्त्वाच्या पोस्टिंग वन मंत्रालयातून मिळाल्या आहेत. मोठे अर्थकारण या पोस्टिंग मागे दडल्याची चर्चा  आता आहे. महाराष्ट्र नागरी सेवा २०१९ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत भरती झालेल्या ४१ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय प्रशिक्षणाचा कालावधी २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्यानंतर या आरएफओंना नियमित पदस्थापना देण्यात आली. कार्यासन अधिकारी वी. श. जाखलेकर यांच्या आदेशाने संबंधित आरएफओंना कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र, व्याघ्र प्रकल्प आणि सामाजिक वनीकरणातील पदे रिक्त ठेवण्यात आले असून, केवळ क्रीम पोस्टिंग नवख्या आरएफओंना देण्यामागचा हेतू अर्थकारणाशी निगडित असल्याची चर्चा होत आहे.

३१ आरएफओंना प्रादेशिकमध्ये पोस्टिंग ४१ 

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपैकी ३१ जणांना प्रादेशिकच्या पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. मे २०२४ पासून या जागा रिक्त ठेवण्यात आल्या, हे विशेष. कारण परिविक्षाधीन काळ संपणार असल्यामुळे या नवख्या आरएफओंसाठी अगोदर जागा बुक केल्या होत्या. त्यामुळे मे २०२४ मध्ये महत्त्वाच्या या सर्व जागा भरण्यात आल्या नाहीत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मेहकर, अहेरी, पिंपळनेर, धारूर, येवला, जत, पंढरपूर आदी परिक्षेत्राची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. प्रादेशिक उपविभागात पोस्टिंग मिळविण्यासाठी नवख्या आरएफओंनी मंत्रालयात अगोदरच आपले वजन खर्ची घातले. केवळ ८ जागा या वन्यजीव उपविभागातील असून, अद्यापही काही पदे रिक्त ठेवून प्रादेशिक उपविभागात पदे भरण्यात आली. 

लक्ष्मीदर्शनामुळे लाभ

आठ महिने जागा रिक्त ठेवण्यामागचा हेतू समोर आला आहे. सेवेत दिवस उजाडलेल्या आरएफओंना ‘लक्ष्मीदर्शन’ मार्गे वन विभागात सहज पोस्टिंग मिळते. प्रादेशिक उपविभागातील दरारा, अर्थकारण याची भुरळ पडलेल्या नवख्या आरएफओंना प्रादेशिकमध्ये संधी देण्यासाठी मे महिन्यात सोय करण्यात आली. परिविक्षाधीन काळ संपल्यानंतर मनासारखी पोस्टिंग त्यांना देण्यात आली. त्याकरिता पडदा मागची सूत्रे अगोदरच हलविण्यात आली होती.

वन्यजीव विभागात केवळ ४ जणांना पोस्टिंग परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नुकतीच पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना यादीवर नजर टाकल्यास केवळ ८ आरएफओंना वन्यजीव उपविभागात पदस्थापना दिल्या गेली. राज्याच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३० च्यावर आरएमओंची पदे रिक्त असून, ती गत आठ महिन्यापासून भरण्यात आली नाहीत.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती