शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

डीसीपी देणार ‘परी’च्या पंखाना बळ; क्षणात स्विकारले 'त्या' कन्येचे शैक्षणिक पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:35 IST

तृतीयपंथीय संमेलनात एका दाम्पत्याने नऊ महिन्याचे बाळ केले स्वाधीन

अमरावती : शहरातील धर्मदाय कॉटन फंड परिसरात तृतीयपंथीयांचे अखिल भारतीय मंगलमुखी संमेलन सुरु आहे. या संमेलनामध्ये जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या ९ महिन्याचा बाळाला तृतीयपंथीयांच्या स्वाधीन केले. यासंदर्भातील माहिती आयोजकांनी पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांना दिली. यावेळी विक्रम साळी यांनी या चिमुकलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्विकारात मानवतेचा परिचय दिला आहे.

अमरावतीत पहिल्यांदाच राष्ट्रीयस्तरावरील तृतीयपंथीयांचे संमेलन होत आहे. १ ते १५ दरम्यान होणाऱ्या संमेलनात विविध कार्यक्रमाचे अयोजन केले आहे. समाजामध्ये स्त्री, परुषांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा, त्यांनाही अधिकार मिळावे, संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार प्रमाणेच इतरही सुविधा मिळाव्या, तृतियपंथीयांचे आपसी मतभेद व इतर सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी हे संमेलन होत असल्याची माहिती आयोजक सोना नायक व नेहा नायक यांनी दिली.

या संमेलनाला गत काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी भेट देत संमेलनाची पाहणी केली. दरम्यान आयोजकांशी चर्चा करीत असताना त्यांचे लक्ष एका बाळावर गेले. यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली असता, या चिमुकलीला अमरावतीमधील एक दाम्पत्याने आयोजकांकडे स्वाधीन केल्याची माहिती समोर आली. या चिमुकलीची संपूर्ण जबाबदारी तृतीयपंथींनी स्वीकारली असून तिचे नाव ‘परी’ ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त साळी यांनी मानवतेचा परिचय देत या कन्येच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली, हे विशेष.

अनेक चिमुकले मदतीच्या प्रतीक्षेत

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्येही अशाच प्रकारे तीन बाळांना त्यांच्या आई-वडीलांनी सोपविले आहे. अमरावती, गुजरात, पंजाबसह इतरही राज्यातही अनेक चिमुकल्याचे आई-वडील त्यांना सोडून गेले आहेत. परंतु त्यांच्या भविष्याचा विचार मात्र कोणी करत नाही. समाजाने ठरविले तर या चिमुकल्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करता येते. सरकार आणि समाजाने तृतीयपंथीयांना वाईट वागणूक न देता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती