शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

कापसाला कवडीमोल भाव; शेतकरी हताश

By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST

तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी

वरुड : तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. पेरणीसाठी घेतलेले बियाणे, कीटकनाशकाच्या रक्कमेत दुकानदाराला कापूस द्यावा लागतो. यंदा कापसाला केवळ ३ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली.शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही कुठेच न डगमगता नव्या जोमाने शेतीला सुरुवात केली. गत वर्षी कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड केली. परंतु पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या वातीला नवीन कापूस मिळाला नाही. आता कुठे कापसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. परंतु भाव घसरल्याने केवळ ३ हजार ७०० रुपयेपर्यंतच प्रति क्विंटलचे भाव मिळत आहे. यामुळे ेकापूस उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. राजकारण्यांच्या फसव्या आश्वानाचे बळी शेतकरी ठरत आहे. १२ हजार हेंक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लगावड आहे. परंतु सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने उशिरा लागवड झाली. काहीसा पाऊस पडल्याने पुन्हा दडी मारली. पिकाला पाणी देऊन शेतकऱ्यांना ओलीत करावे लागत आहे. यातच कीटकनाशके, खते महागल्याने शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम घेऊन मशागती करावी लागते. काही दुकानदार कापूस, सोयाबीनचे व्यापारी असल्याने पेरणीच्यावेळी बिया बियाणे, खते, कीटकनाशके घेताना हजारो रुपयांसाठी कापूस सोयाबीन दुकानदारांनाच देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. परंतु यावर्षी भाव नसल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)