शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला कवडीमोल भाव; शेतकरी हताश

By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST

तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी

वरुड : तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. पेरणीसाठी घेतलेले बियाणे, कीटकनाशकाच्या रक्कमेत दुकानदाराला कापूस द्यावा लागतो. यंदा कापसाला केवळ ३ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली.शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही कुठेच न डगमगता नव्या जोमाने शेतीला सुरुवात केली. गत वर्षी कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड केली. परंतु पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या वातीला नवीन कापूस मिळाला नाही. आता कुठे कापसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. परंतु भाव घसरल्याने केवळ ३ हजार ७०० रुपयेपर्यंतच प्रति क्विंटलचे भाव मिळत आहे. यामुळे ेकापूस उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. राजकारण्यांच्या फसव्या आश्वानाचे बळी शेतकरी ठरत आहे. १२ हजार हेंक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लगावड आहे. परंतु सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने उशिरा लागवड झाली. काहीसा पाऊस पडल्याने पुन्हा दडी मारली. पिकाला पाणी देऊन शेतकऱ्यांना ओलीत करावे लागत आहे. यातच कीटकनाशके, खते महागल्याने शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम घेऊन मशागती करावी लागते. काही दुकानदार कापूस, सोयाबीनचे व्यापारी असल्याने पेरणीच्यावेळी बिया बियाणे, खते, कीटकनाशके घेताना हजारो रुपयांसाठी कापूस सोयाबीन दुकानदारांनाच देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. परंतु यावर्षी भाव नसल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)