शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कापसाला कवडीमोल भाव; शेतकरी हताश

By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST

तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी

वरुड : तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. पेरणीसाठी घेतलेले बियाणे, कीटकनाशकाच्या रक्कमेत दुकानदाराला कापूस द्यावा लागतो. यंदा कापसाला केवळ ३ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली.शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही कुठेच न डगमगता नव्या जोमाने शेतीला सुरुवात केली. गत वर्षी कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड केली. परंतु पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या वातीला नवीन कापूस मिळाला नाही. आता कुठे कापसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. परंतु भाव घसरल्याने केवळ ३ हजार ७०० रुपयेपर्यंतच प्रति क्विंटलचे भाव मिळत आहे. यामुळे ेकापूस उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. राजकारण्यांच्या फसव्या आश्वानाचे बळी शेतकरी ठरत आहे. १२ हजार हेंक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लगावड आहे. परंतु सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने उशिरा लागवड झाली. काहीसा पाऊस पडल्याने पुन्हा दडी मारली. पिकाला पाणी देऊन शेतकऱ्यांना ओलीत करावे लागत आहे. यातच कीटकनाशके, खते महागल्याने शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम घेऊन मशागती करावी लागते. काही दुकानदार कापूस, सोयाबीनचे व्यापारी असल्याने पेरणीच्यावेळी बिया बियाणे, खते, कीटकनाशके घेताना हजारो रुपयांसाठी कापूस सोयाबीन दुकानदारांनाच देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. परंतु यावर्षी भाव नसल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)