शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कपाशी कमी; तूर, सोयाबीनची क्षेत्रवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:11 IST

यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखरिपाची तयारी : यंदा ७.२८ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी यंदा पेरणीक्षेत्रात बदल नाही. मात्र, बोंड अळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशीचे यंदा पेरणीक्षेत्र २० ते ३० हजारांनी कमी होऊन तूर व काही प्रमाणात सोयाबीन क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.मागील हंगामात अपुऱ्या पावसाने सोयाबीन मूग, उडीद सारखी अल्पावधीची पिके बाद झाली. त्यामुळे शेतकºयांची मदार कपाशीवर असताना आॅक्टोबरच्या सुरुवातीला आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरिपाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. याच अनुषंगाने रविवारी पालकमंत्र्यांनी खरीपपूर्व आढावा सभा घेऊन हंगामाची तयारी जाणून घेऊन सूचना केल्यात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये सोयाबीनचे २ लाख ९५ हजार हेक्टर, कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर, तूर पिकाचे १ लाख ३० हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, धान ३५०० हेक्टर व मटकी, कारळ, बाजरी, मका, तीळ, भाजीपाला आदी १८ हजार ६१२ हेक्टर पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे.अमरावती तालुक्यात ५७ हजार ७७८ हेक्टर, भातकुली तालुक्यात ५० हजार ३५४, नांदगाव तालुक्यात ६७ हजार ७७०, तिवसा तालुक्यात ४५ हजार ४५०, चांदूर रेल्वे तालुक्यात ४२ हजार ६५०, धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४५०, मोर्शी तालुक्यात ६२ हजार ८००, वरूड तालुक्यात ४८ हजार ६००, चांदूर बाजार तालुक्यात ६१ हजार, अचलपूर तालुक्यात ४७ हजार ९००, दर्यापूर तालुक्यात ७० हजार ७५०, धारणी तालुक्यात ४६ हजार ८००, तर चिखलदरा तालुक्यात २५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.कपाशीच्या क्षेत्रात ३० हजार हेक्टरने कमीगतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३० हजार हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे, तर सोयाबीनचे क्षेत्र सारखेच राहील. तुरीच्या क्षेत्रात २० हजारांनी वाढ प्रस्तावित आहे. मूग १० ते १२ हजार, तर उडिदाचे क्षेत्र १५ हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास ही स्थिती कायम राहील. पावसाचे आगमन उशिरा झाल्यास मूग, उडिदाचे क्षेत्र सोयाबीनला जाण्याची शक्यता आहे.