शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी कमी; तूर, सोयाबीनची क्षेत्रवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:11 IST

यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखरिपाची तयारी : यंदा ७.२८ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी यंदा पेरणीक्षेत्रात बदल नाही. मात्र, बोंड अळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशीचे यंदा पेरणीक्षेत्र २० ते ३० हजारांनी कमी होऊन तूर व काही प्रमाणात सोयाबीन क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.मागील हंगामात अपुऱ्या पावसाने सोयाबीन मूग, उडीद सारखी अल्पावधीची पिके बाद झाली. त्यामुळे शेतकºयांची मदार कपाशीवर असताना आॅक्टोबरच्या सुरुवातीला आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरिपाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. याच अनुषंगाने रविवारी पालकमंत्र्यांनी खरीपपूर्व आढावा सभा घेऊन हंगामाची तयारी जाणून घेऊन सूचना केल्यात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये सोयाबीनचे २ लाख ९५ हजार हेक्टर, कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर, तूर पिकाचे १ लाख ३० हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, धान ३५०० हेक्टर व मटकी, कारळ, बाजरी, मका, तीळ, भाजीपाला आदी १८ हजार ६१२ हेक्टर पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे.अमरावती तालुक्यात ५७ हजार ७७८ हेक्टर, भातकुली तालुक्यात ५० हजार ३५४, नांदगाव तालुक्यात ६७ हजार ७७०, तिवसा तालुक्यात ४५ हजार ४५०, चांदूर रेल्वे तालुक्यात ४२ हजार ६५०, धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४५०, मोर्शी तालुक्यात ६२ हजार ८००, वरूड तालुक्यात ४८ हजार ६००, चांदूर बाजार तालुक्यात ६१ हजार, अचलपूर तालुक्यात ४७ हजार ९००, दर्यापूर तालुक्यात ७० हजार ७५०, धारणी तालुक्यात ४६ हजार ८००, तर चिखलदरा तालुक्यात २५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.कपाशीच्या क्षेत्रात ३० हजार हेक्टरने कमीगतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३० हजार हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे, तर सोयाबीनचे क्षेत्र सारखेच राहील. तुरीच्या क्षेत्रात २० हजारांनी वाढ प्रस्तावित आहे. मूग १० ते १२ हजार, तर उडिदाचे क्षेत्र १५ हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास ही स्थिती कायम राहील. पावसाचे आगमन उशिरा झाल्यास मूग, उडिदाचे क्षेत्र सोयाबीनला जाण्याची शक्यता आहे.