शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कपाशी कमी; तूर, सोयाबीनची क्षेत्रवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:11 IST

यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखरिपाची तयारी : यंदा ७.२८ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी यंदा पेरणीक्षेत्रात बदल नाही. मात्र, बोंड अळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशीचे यंदा पेरणीक्षेत्र २० ते ३० हजारांनी कमी होऊन तूर व काही प्रमाणात सोयाबीन क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.मागील हंगामात अपुऱ्या पावसाने सोयाबीन मूग, उडीद सारखी अल्पावधीची पिके बाद झाली. त्यामुळे शेतकºयांची मदार कपाशीवर असताना आॅक्टोबरच्या सुरुवातीला आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरिपाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. याच अनुषंगाने रविवारी पालकमंत्र्यांनी खरीपपूर्व आढावा सभा घेऊन हंगामाची तयारी जाणून घेऊन सूचना केल्यात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये सोयाबीनचे २ लाख ९५ हजार हेक्टर, कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर, तूर पिकाचे १ लाख ३० हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, धान ३५०० हेक्टर व मटकी, कारळ, बाजरी, मका, तीळ, भाजीपाला आदी १८ हजार ६१२ हेक्टर पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे.अमरावती तालुक्यात ५७ हजार ७७८ हेक्टर, भातकुली तालुक्यात ५० हजार ३५४, नांदगाव तालुक्यात ६७ हजार ७७०, तिवसा तालुक्यात ४५ हजार ४५०, चांदूर रेल्वे तालुक्यात ४२ हजार ६५०, धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४५०, मोर्शी तालुक्यात ६२ हजार ८००, वरूड तालुक्यात ४८ हजार ६००, चांदूर बाजार तालुक्यात ६१ हजार, अचलपूर तालुक्यात ४७ हजार ९००, दर्यापूर तालुक्यात ७० हजार ७५०, धारणी तालुक्यात ४६ हजार ८००, तर चिखलदरा तालुक्यात २५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.कपाशीच्या क्षेत्रात ३० हजार हेक्टरने कमीगतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३० हजार हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे, तर सोयाबीनचे क्षेत्र सारखेच राहील. तुरीच्या क्षेत्रात २० हजारांनी वाढ प्रस्तावित आहे. मूग १० ते १२ हजार, तर उडिदाचे क्षेत्र १५ हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास ही स्थिती कायम राहील. पावसाचे आगमन उशिरा झाल्यास मूग, उडिदाचे क्षेत्र सोयाबीनला जाण्याची शक्यता आहे.