शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसाच्या दरात ३०० रुपयांनी वाढ; सरकीच्या दरवाढीने कापूस विक्रेत्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:55 IST

Amravati : ८० टक्के शेतकऱ्यांनी यापूर्वीच विकला कापूस, सध्याही हमीभावापेक्षा दर कमीच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सरकीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी दरवाढ झालेली आहे. त्यामुळे कापसाचेही दर ७२५० ते ७५०० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केलेली आहे.

सीसीआयद्वारा कापसाची खरेदी २४ मार्चपासून बंद करण्यात आली. ग्रेड कमी केल्याने सीसीआयचे दर हमीभावापेक्षा ७४२१ रुपये होते. यामध्ये सरकीचे दर पूर्वी ३३०० रुपये क्विंटल होते ते २६ मार्चला ३७५० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. उन्हाळ्यात सरकीच्या दरात काही प्रमाणात वाढ दरवर्षी होते. सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही फरक दरावर झाला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी पुन्हा दरवाढ होईल किंवा हेच दर कायम राहतील, याची शाश्वती नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले.

गाठीचा दर ५१५० रुपयांवरसरकीच्या दरात वाढ झालेली असली तरी रुईच्या दरात अद्याप वाढ झालेली नाही. सद्यःस्थितीत रुईचे दर ६५ सेंट पर पाऊंड आहे. तर गठाणचे दर (१७० किलो) ५१७० रुपयांवर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची दरवाढ, चीनच्या गारमेंट उत्पादनावर अमेरिकेने वाढविलेला टेरिफ यासह अन्य बाबींमुळे देशांतर्गत कापसाचे दर टिकून असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

"सरकीच्या दरात वाढ झाल्याने कापसाच्या स्थानिक दरात थोडी वाढ झालेली आहे. दरवाढ पुढे कायम राहील, हे निश्चित नाही, यासाठी विविध घटक कारणीभूत असतात."- पवन देशमुख, शेतमालाचे अभ्यासक

टॅग्स :Amravatiअमरावतीcottonकापूस