शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिवाळीपूर्वी पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात, कापूस वेचणीपूर्वीच्या सीतदहीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 13:42 IST

कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले.

अमरावती : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस पीक घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.

कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले. कुणी कपाशीच्या शेतात झुला बांधून पूजा करून प्रसादाचे वाटप करतात. त्यानंतर कापूस काढण्यासाठी प्रारंभ करतात. पूर्व विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळ्या पूजेने कापूस वेचण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कापसाच्याही उत्पादनात घट येणार आहे.

जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपारीची बोंड गळून पडली. पावसामुळे ओले झालेली बोंड सडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कपाशीचा भरघोस उत्पादनाची आशा मावळली आहे. यात काही शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. विदर्भात प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिले जाते. कधी सोयाबीनच्या कमी-अधिक उत्पन्नामुळे कापसाचे क्षेत्र बदलत आले आहे.

गतवर्षी मिळालेल्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पहाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. कापूस काढणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकऱ्यांकडून शेतात सीतादही करण्यात येते. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कापसाच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पूजापाठ कापूस वेचण्यापूर्वीच सुरू झाली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी