शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

भ्रष्ट वीज अभियंत्याची शेतकऱ्यांनी काढली वरात!

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे ...

डीपी बसविण्यासाठी घेतले पैसे : रक्कम परत देण्याचे दिले लेखी आश्वासन परतवाडा : शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे वर्षभरापूर्वी रक्कम वसूल करणाऱ्या अचलपूर वीज कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंताची संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी २ वाजता वरात काढली. घेतलेली रक्कम परत देण्याच्या आश्वासनासह डीबी बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला मुक्त केले. फुलचंद मारोती टेंभेकर असे अचलपूर वीज वितरण कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याकडे धानोरा पूर्णा परिसराचा कार्यभार आहे. धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्यांना ओलीत करता येत नव्हते. त्यासाठी त्यांनी गतवर्षी आॅक्टोबर २०१४ मध्ये संबंधित विद्युत कार्यालयात डीबी बसवून देण्याची लेखी मागणी केली होती. आवश्यक ती कागदपत्रेसुध्दा शेतकऱ्यांनी सादर केली होती. परंतु अभियंता फुलचंद टेंभेकर यांनी डीबी बसवून देण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याकडून दोन हजार रूपये याप्रमाणे ४० हजारांची रक्कम घेतली. डीबी बसल्यानंतर पिकांचे नुकसान होणार नाही, या आशेवर शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही डीबी बसविण्यात आली नाही. आंदोलनकर्त्यांमध्ये बाबूराव काळे, बाबूभाऊ वैद्य, प्रकाश राऊत, गजानन पारिसे, शे. बशिर सौदागर, दिगंबर साऊरकर, दीपक कडू, प्रवीण वऱ्हाडे, कृपासागर राऊत, रवी चांदूरकर, अश्विन मानकर, गजानन डवरे, रोशन भडांगे, मोषराज दांडगे, राहुल सोलव, मनोज मांडवकर, किशोर तायडे उपस्थित होते. या घटनेबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. - आणि शेतकरी झालेत आक्रमकगेल्या वर्षभरापासून वीज कंपनीच्या पायऱ्या झिजविणारे शेतकरी सोमवारी दुपारी १ वाजता कार्यालयावर धडकले. त्यांनी पुन्हा टेंभेकर यांना विनंती केली. मात्र, त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले. याचवेळी तेथे उपस्थित चांदूरबाजार पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश पवार यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी अभियंत्याला जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला पायी परतवाडा ठाण्यात नेले. तेथे त्याने शेतकऱ्यांची रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)नापिकी व अपुरा पाऊस यामुळे पीक हातातून गेल्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशात भ्रष्ट विद्युत अभियंतेदेखील त्यांची लूट करीत आहेत. अशांवर फौजदारी करून त्यांना निलंबित करावे.- योगेश पवार,माजी उपसभापती.धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांकडून वर्षभरापूर्वी अभियंता टेंभेकर यांनी ४० हजार रूपये घेतले. मात्र, डीबी बसवून दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक ओलिताअभावी शेतातच सुकू लागले आहे. - प्रकाश राऊत, शेतकरी, धानोरा पूर्णा.