शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

भ्रष्ट वीज अभियंत्याची शेतकऱ्यांनी काढली वरात!

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे ...

डीपी बसविण्यासाठी घेतले पैसे : रक्कम परत देण्याचे दिले लेखी आश्वासन परतवाडा : शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे वर्षभरापूर्वी रक्कम वसूल करणाऱ्या अचलपूर वीज कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंताची संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी २ वाजता वरात काढली. घेतलेली रक्कम परत देण्याच्या आश्वासनासह डीबी बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला मुक्त केले. फुलचंद मारोती टेंभेकर असे अचलपूर वीज वितरण कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याकडे धानोरा पूर्णा परिसराचा कार्यभार आहे. धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्यांना ओलीत करता येत नव्हते. त्यासाठी त्यांनी गतवर्षी आॅक्टोबर २०१४ मध्ये संबंधित विद्युत कार्यालयात डीबी बसवून देण्याची लेखी मागणी केली होती. आवश्यक ती कागदपत्रेसुध्दा शेतकऱ्यांनी सादर केली होती. परंतु अभियंता फुलचंद टेंभेकर यांनी डीबी बसवून देण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याकडून दोन हजार रूपये याप्रमाणे ४० हजारांची रक्कम घेतली. डीबी बसल्यानंतर पिकांचे नुकसान होणार नाही, या आशेवर शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही डीबी बसविण्यात आली नाही. आंदोलनकर्त्यांमध्ये बाबूराव काळे, बाबूभाऊ वैद्य, प्रकाश राऊत, गजानन पारिसे, शे. बशिर सौदागर, दिगंबर साऊरकर, दीपक कडू, प्रवीण वऱ्हाडे, कृपासागर राऊत, रवी चांदूरकर, अश्विन मानकर, गजानन डवरे, रोशन भडांगे, मोषराज दांडगे, राहुल सोलव, मनोज मांडवकर, किशोर तायडे उपस्थित होते. या घटनेबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. - आणि शेतकरी झालेत आक्रमकगेल्या वर्षभरापासून वीज कंपनीच्या पायऱ्या झिजविणारे शेतकरी सोमवारी दुपारी १ वाजता कार्यालयावर धडकले. त्यांनी पुन्हा टेंभेकर यांना विनंती केली. मात्र, त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले. याचवेळी तेथे उपस्थित चांदूरबाजार पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश पवार यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी अभियंत्याला जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला पायी परतवाडा ठाण्यात नेले. तेथे त्याने शेतकऱ्यांची रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)नापिकी व अपुरा पाऊस यामुळे पीक हातातून गेल्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशात भ्रष्ट विद्युत अभियंतेदेखील त्यांची लूट करीत आहेत. अशांवर फौजदारी करून त्यांना निलंबित करावे.- योगेश पवार,माजी उपसभापती.धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांकडून वर्षभरापूर्वी अभियंता टेंभेकर यांनी ४० हजार रूपये घेतले. मात्र, डीबी बसवून दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक ओलिताअभावी शेतातच सुकू लागले आहे. - प्रकाश राऊत, शेतकरी, धानोरा पूर्णा.