शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News In Amravati : पीपीई किट घालून पालकमंत्री पोहोचल्या थेट रुग्णालयात; रुग्णांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 15:22 IST

CoronaVirus News In Amravati : रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देकोविड रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला भेटून त्यांची विचारपूस पालकमंत्र्यांनी केली. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे.

 अमरावती : कोविड रुग्णांना नीट उपचार मिळतात का?, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते की नाही, हे तपासण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी रात्री अचानक कोविड रुग्णालयाला भेट दिली. 

पीपीई किट घालून त्यांच्या अशा अचानक कोविड वॉर्डात शिरण्याने डॉक्टरांसह अवघे इर्विन रुग्णालय अचंबित झाले. रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती पाहण्याचा व रुग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला. तत्काळ तो अंमलातही आणला. दरम्यान त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. कोविड वॉर्डात उपचार घेतलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. रवि भूषण यांची टीम अहोरात्र जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रुग्णसेवा देत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पीपीई किट घालून दिवसभर काम करणे किती कष्टप्रद राहते, याचा पालकमंत्र्यांनी शनिवारी पीपीई कीट घालून अनुभव घेतला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री म्हणाल्या.

कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी चांगले काम करीत असल्याची माहिती सर्व रुग्णांनी दिली.

अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचा प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्याप २१८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले १२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचाराने बरे होऊन ते घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहे. डॉक्टर व त्यांची टीम अहोरात्र परिश्रम करीत आहे.  

कोविड रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला भेटून त्यांची विचारपूस पालकमंत्र्यांनी केली. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYashomati Thakurयशोमती ठाकूर