शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

कोरोनामुळे विवाह समारंभ कौटुंबिक वातावरणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST

अमरावती : कोरोनाने सर्वच प्रथा-परंपरा, रुढी संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने या ...

अमरावती : कोरोनाने सर्वच प्रथा-परंपरा, रुढी संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने या काळात लग्न समारंभातील तामझाम आपसूकच कमी झाला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधुपित्यांनी कोरोनाला वाकुल्या दाखवत अगदी थाटात आपल्याकडील लग्नाचा बार उडवून दिला. मुलामुलींचे लग्न थाटामाटात करण्याची प्रत्येक आई-वडिलाची इच्छा असते. त्याबद्दल काही जणांकडून जाहीर विरोधदेखील होतो. कोरोनाने विवाह समारंभातील या बडेजावाला ‘ब्रेक’ लागला आहे. सध्या राज्य सरकारने लागू केलेल्या लाकडॉऊनमध्ये लग्न सोहळ्यासाठी २५ जणांची उपस्थिती आणि दोन तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर, वधुपित्यांनी आपल्याकडील नियोजित विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत, तर बहुतांश प्रकरणात वर-वधुपक्षाने अगदी कौटुंबिक सोहळ्यात विवाह समारंभ उरकून घेतले. अगदी कमी खर्चात, कर्जबाजारी न होता विवाह पार पडत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला, तर श्रीमंतांमधील लग्नात आनंद लुटायला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

बॉक्स

कमी खर्चाचा धडा

विवाह सोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ राबविण्यात येत होती. मात्र, कोरोना विषाणू संकटाने वैयक्तिक विवाह सोहळा ही कमी खर्चात पार पाडता येतो, याचा धडा दिला आहे.