शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कोरोना बळी, ४०० चे दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्यूदर दोन टक्क्यावर स्थिरावल्याने चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाच्या पक्ल्याला रुग्णाची नोंद येथील हाथीपुरा भागात झाली व हा रुग्ण ‘होमडेथ’ असल्याने पहिल्या संक्रमिताची नोंद ४ एप्रिल रोजी झालेली आहे. या १० महिन्यांच्या कालावधीत कोमार्बिड रुग्णांचे सातत्याने मृत्यू होत आहेत. यात ८० टक्के रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यंना कोरोना संसर्गासह इतरही आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथऑडिट’मध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्वाधिक बळी ५० ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल असल्याने या वयोगटातील रुग्णांची व व्यक्तींनीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

मुळात कोरोनाचा विषाणू हा श्वसन प्रक्रियेवर अटॅक करणारा असल्याने अंगावर दुखणे काढल्यास जिवावर बेतण्याचाच प्रकार ठरतो. किंबहुना सुरुवातीला झालेल्या आठ ते दहा ‘होमडेथ’ याच प्रकारातील रुग्ण होते, असे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर करणे व याच माध्यमातून स्वत:सह स्वत:च्या परिवाराची सुरक्षा जपणे हे कोरोना संसर्गाच्या काळात महत्त्वाचे ठरत आहे.

या १० महिन्यांच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत १९ हजार ९०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजेच रोज सरासरी ६५ रुग्ण या काळात निष्पन्न झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

बॉक्स

चाचण्यांची संख्या १.५५ लाख क्राॅस

या १० महिन्यांच्या कालावधीत कोरोना चाचण्यांची संख्या १,५५,३६ वर पोहोचली आहे. यात आरटी-पीसीआर चाचण्या ८१,९२० आहे व यातही विद्यापीठाचे लॅबद्वारा ७२,१६३ नमुन्यांची तपासणी केलेली आहे. रॅपिड अँन्टीजेनमध्ये ७१,९१५ चाचण्या शनिवारपर्यंत करण्यात आल्या आहेत. यात शहरी भागात ४०,०८३, तर ग्रामीणमध्ये ३१,८७२ चाचण्या करण्यात आल्या. या सर्व प्रकारात १,३४,५४१ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.

बॉक्स

५० रुग्ण गंभीर स्थितीत

आरोग्य विभागाच्या अहवालानूसार शनिवारपर्यंत ३४१ कोरोनाग्रस्तांना आयसोलेशनमध्ये ठेवलेले आहे. २९१ रुग्ण साधारण परिस्थितीत, तर ५० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी जिल्ह्यात १५६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने आतापर्यंत १९,१०० रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आलेले आहे. या आठवड्याात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे चाचण्यांची संख्यावाढ झालेली आहे.