शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना; उशिरा चाचण्यांनी वाढतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात ...

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात आल्याचे किंवा त्यांना उशिरा टेस्ट करायला सांगितल्याचे निदर्शनास आले. ज्या काळात आजारात धोका अधिक असतो, त्यावेळी अनावश्यक चाचण्या करत रुग्ण दवाखान्यात फिरत असल्यानेच धोका वाढत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी बुधवारी सांगितले.

रुग्णांना विनाकारण ‘एचआरसीटी’सारख्या महागड्या तपासण्या करायला सांगितले जाते. मात्र, कोविड-१९ च्या चाचणीचा सल्ला दिला जात नाही किंवा अनेकदा रुग्णही सदर चाचणी करण्यास तयार नसतात. या कारणामुळे रुग्ण नाहकरीत्या गंभीर होतो. सर्दी- पडसा, तापासारखी लक्षणे असतील तर स्वत:हून कोरोनाच्या टेस्टसाठी आग्रह धरला पाहिजे. कोरोना प्रतिबंधांसाठी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीत चाचणी व लसीकरणाचा समावेश करून, तशी पंचसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्दी, पडसा, ताप ही लक्षणे कोरोनाची असू शकतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जे कुणी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनीही चाचणी करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणार नाही आणि त्यांना विलगीकरणात ठेवणार नाही, तोपर्यंत साथीची शृंखला तुटणार नसल्याचे ते म्हणाले.

सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत प्रमाण दुपटीवर

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व बाधितांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली होती. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा उचल खाल्ली आणि अजूनही ती वाढत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत रुग्णसंख्या व बाधितांच्या मृत्यूची संख्या दुपटीवर गेली. कोरोनाबाधितांचा दुसरा चढता आलेख पाहता जास्त जागरुकता येणे आवश्यक असल्याचे सीएस म्हणाले.

बॉक्स

आजाराचा बाऊ नको

साथीविषयी अनेक गैरसमजही साथ वाढण्यास कारणीभूत ठरतात. आजाराचा बाऊ करून नियंत्रण करता येणार नाही. त्यासाठी पंचसूत्री पाळली गेली पाहिजे. सर्वप्रथम ज्यांच्यासाठी लस उपलब्ध आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे व त्यानंतरदेखील दक्षता अवलंबलीच पाहिजे. चाचणीही वेळीच केली पाहिजे, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

कोट

शहरात व तालुक्यांनाही लसीकरणाची सुविधा, तसेच ठिकठिकाणी चाचणी सुविधाही उपलब्ध आहे. सर्वांनी लस घ्यावी. वेळीच निदान व तत्काळ उपचार हे ध्येय ठेवूया. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर, लसीकरण व लक्षणे दिसताच चाचणी ही पंचसूत्री प्रत्येकाने पाळावी.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक