शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

कोरोना; उशिरा चाचण्यांनी वाढतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात ...

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात आल्याचे किंवा त्यांना उशिरा टेस्ट करायला सांगितल्याचे निदर्शनास आले. ज्या काळात आजारात धोका अधिक असतो, त्यावेळी अनावश्यक चाचण्या करत रुग्ण दवाखान्यात फिरत असल्यानेच धोका वाढत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी बुधवारी सांगितले.

रुग्णांना विनाकारण ‘एचआरसीटी’सारख्या महागड्या तपासण्या करायला सांगितले जाते. मात्र, कोविड-१९ च्या चाचणीचा सल्ला दिला जात नाही किंवा अनेकदा रुग्णही सदर चाचणी करण्यास तयार नसतात. या कारणामुळे रुग्ण नाहकरीत्या गंभीर होतो. सर्दी- पडसा, तापासारखी लक्षणे असतील तर स्वत:हून कोरोनाच्या टेस्टसाठी आग्रह धरला पाहिजे. कोरोना प्रतिबंधांसाठी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीत चाचणी व लसीकरणाचा समावेश करून, तशी पंचसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्दी, पडसा, ताप ही लक्षणे कोरोनाची असू शकतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जे कुणी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनीही चाचणी करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणार नाही आणि त्यांना विलगीकरणात ठेवणार नाही, तोपर्यंत साथीची शृंखला तुटणार नसल्याचे ते म्हणाले.

सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत प्रमाण दुपटीवर

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व बाधितांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली होती. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा उचल खाल्ली आणि अजूनही ती वाढत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत रुग्णसंख्या व बाधितांच्या मृत्यूची संख्या दुपटीवर गेली. कोरोनाबाधितांचा दुसरा चढता आलेख पाहता जास्त जागरुकता येणे आवश्यक असल्याचे सीएस म्हणाले.

बॉक्स

आजाराचा बाऊ नको

साथीविषयी अनेक गैरसमजही साथ वाढण्यास कारणीभूत ठरतात. आजाराचा बाऊ करून नियंत्रण करता येणार नाही. त्यासाठी पंचसूत्री पाळली गेली पाहिजे. सर्वप्रथम ज्यांच्यासाठी लस उपलब्ध आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे व त्यानंतरदेखील दक्षता अवलंबलीच पाहिजे. चाचणीही वेळीच केली पाहिजे, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

कोट

शहरात व तालुक्यांनाही लसीकरणाची सुविधा, तसेच ठिकठिकाणी चाचणी सुविधाही उपलब्ध आहे. सर्वांनी लस घ्यावी. वेळीच निदान व तत्काळ उपचार हे ध्येय ठेवूया. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर, लसीकरण व लक्षणे दिसताच चाचणी ही पंचसूत्री प्रत्येकाने पाळावी.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक