शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

कोरोना; उशिरा चाचण्यांनी वाढतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात ...

अमरावती : सध्या आमच्याकडे जे रुग्ण येताहेत किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात आल्याचे किंवा त्यांना उशिरा टेस्ट करायला सांगितल्याचे निदर्शनास आले. ज्या काळात आजारात धोका अधिक असतो, त्यावेळी अनावश्यक चाचण्या करत रुग्ण दवाखान्यात फिरत असल्यानेच धोका वाढत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी बुधवारी सांगितले.

रुग्णांना विनाकारण ‘एचआरसीटी’सारख्या महागड्या तपासण्या करायला सांगितले जाते. मात्र, कोविड-१९ च्या चाचणीचा सल्ला दिला जात नाही किंवा अनेकदा रुग्णही सदर चाचणी करण्यास तयार नसतात. या कारणामुळे रुग्ण नाहकरीत्या गंभीर होतो. सर्दी- पडसा, तापासारखी लक्षणे असतील तर स्वत:हून कोरोनाच्या टेस्टसाठी आग्रह धरला पाहिजे. कोरोना प्रतिबंधांसाठी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीत चाचणी व लसीकरणाचा समावेश करून, तशी पंचसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्दी, पडसा, ताप ही लक्षणे कोरोनाची असू शकतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जे कुणी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनीही चाचणी करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणार नाही आणि त्यांना विलगीकरणात ठेवणार नाही, तोपर्यंत साथीची शृंखला तुटणार नसल्याचे ते म्हणाले.

सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत प्रमाण दुपटीवर

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व बाधितांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली होती. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा उचल खाल्ली आणि अजूनही ती वाढत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत रुग्णसंख्या व बाधितांच्या मृत्यूची संख्या दुपटीवर गेली. कोरोनाबाधितांचा दुसरा चढता आलेख पाहता जास्त जागरुकता येणे आवश्यक असल्याचे सीएस म्हणाले.

बॉक्स

आजाराचा बाऊ नको

साथीविषयी अनेक गैरसमजही साथ वाढण्यास कारणीभूत ठरतात. आजाराचा बाऊ करून नियंत्रण करता येणार नाही. त्यासाठी पंचसूत्री पाळली गेली पाहिजे. सर्वप्रथम ज्यांच्यासाठी लस उपलब्ध आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे व त्यानंतरदेखील दक्षता अवलंबलीच पाहिजे. चाचणीही वेळीच केली पाहिजे, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

कोट

शहरात व तालुक्यांनाही लसीकरणाची सुविधा, तसेच ठिकठिकाणी चाचणी सुविधाही उपलब्ध आहे. सर्वांनी लस घ्यावी. वेळीच निदान व तत्काळ उपचार हे ध्येय ठेवूया. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर, लसीकरण व लक्षणे दिसताच चाचणी ही पंचसूत्री प्रत्येकाने पाळावी.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक