शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वरूड शहरासह तालुक्यात कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

वरूड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. दोन दिवसांत तब्बल ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. ...

वरूड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. दोन दिवसांत तब्बल ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च रोजीदेखील ३८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यात शहरातील १९ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा २८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता वाढली आहे. परिणामी कोरोना त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध थेट फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना अटकावासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तहसीलदार सुटीवर, तर उपविभागातील अधिकारी प्रभारी असल्याने कोरोनाबाबतचा निर्णय घ्यावा तरी कुणी, हा प्रश्न असल्याची चर्चा प्रशासनात आहे. वरूड शहरासह तालुका ‘कोरोना हॉट स्पॉट’ होत असताना, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची रजा मंजूर तरी कशी केली जाते, हा जनसामान्यांचा प्रश्न आहे. नागरिक स्वैर झाल्याने नगरपालिकेच्यावतीने आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाने एक वर्षापासून नागरिकांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी पुन्हा गत पंधरवाड्यापासून कोरोनाने तोंड वर काढले. तहसीलदार रजेवर असल्याने प्रशासन सुस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली नसल्याने निर्णय कुणी घ्यावा, हा प्रश्न आहे. उपविभागीय अधिकारीसुद्धा प्रभारी असल्याने कोरोनाकाळात पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी होत आहे.

- तर थेट फौजदारीच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा थेट फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करू, असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले. सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात, दुकानात, उपाहारगृहात, वाहनात निर्धारित संख्येपेक्षा अकारण गर्दी दिसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. शहरातील ज्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल, ते संपूर्ण घर सॅनिटाईझ केले जाईल. कंटेनमेन्ट झोन तयार करून परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना पॉझिटिव्ह आणि विलगीकरणातील नागरिक रस्त्यावर दिसल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांनी मास्कचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. ताप, सर्दी झाल्यास वेळीच विनाविलंब उपचार घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल देशमुख व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी केले आहे.

-----------