शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दर पाच मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २५,२७० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७९ दिवसांत दरदिवशी ३१९.८७ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून दर ८ तास ३३ मिनिटाला एका पॉझिटिव्हचा बळी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे. याशिवाय दर ८ तास ३३ मिनिटांत एका कोरोनाग्रस्तांचा बळी गेल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. या उद्रेकात ४० टक्क्यांवर गेलेली चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी आता आठ टक्क्यांवर आल्याचा दिलासादेखील आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २५,२७० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७९ दिवसांत दरदिवशी ३१९.८७ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद ४ एप्रिलला झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३५० दिवसांत ४४,९३८ नागरिकांना कोरोनाचा डंख झालेला आहे. म्हणजेच एका दिवसांत १२८.३९ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झाली. दर ११.१८ मिनिटांनी एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे व याच कालावधीत ६२४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दरदिवशी तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दर ८ तास ३३ सेकंदात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटरसोबत स्वॅब नमुने घेण्यासाठी केंद्रेदेखील सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय पथकांद्वारा सातत्याने दंडात्मक कारवायादेखील सुरू आहे. याचाच परिपाक म्हणून या चार दिवसांत कोरोना संसर्गाला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. तीनशे ते चारशेच्या घरात पॉझिटिव्ह येत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासाजनक बाब आहे.

दर ५.४२ मिनिटाला एका कोरोनाग्रस्ताला डिस्चार्जजिल्ह्यात १९ मार्चपर्यंत ३९,५७३ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. हा रिकव्हरी रेट ८८.६८ टक्के आहे. जानेवारी महिन्यापासून १९ मार्चपर्यंत २०,९५७ व्यक्ती संक्रमणमुक्त झालेले आहेत. म्हणजेच दिवसाला २६५,२७ नागरिक कोरोनामुक्त झालेले आहे. दर ५.७१ मिनिटाला एक नागरिक कोरोनामुक्त होत असल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

दिवसाला सरासरी १२८ पॉझिटिव्हजिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे ४ एप्रिलपासून आतापर्यंत ४४,९३८ रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजेच एका दिवसात १२८ व ११ मिनिटे २४ सेकदांला एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे. याशिवाय याच कालावधीत ६२४ कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजेच दरदिवशी दोन व दर १२ तासांत एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

नव्या स्ट्रेनविषयी चर्चा, दुजोरा नाहीकोरोनाच्या जनुकीय रचनेत बदल झालेला असून, जिल्ह्यात कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ आला व याद्वारे संक्रमणात वाढ झाल्याचे आयएमएचे पदाधिकारी सांगत आहेत. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासन बोलावयास तयार नाही. जिल्ह्यातून चार प्रकारांतील १०० नमुने जिनोम स्टडीकरिता पुणे एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. याविषयी आयसीएमआरचा अहवाल अप्राप्त असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या