शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दुष्काळाशी सामना करण्यासाठी पावलं, पाणीटंचाईच्या विविध योजनांसाठी निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 16:18 IST

- गजानन मोहोडअमरावती- यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार असल्याने दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पाणीटंचाईच्या विविध योजनांसाठी यंदा प्राप्त वित्तीय अनुदानातून जिल्हानिहाय उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांना ४३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. सर्वाधिक १९ कोटी ४८ लाख ६१ हजारांचे अनुदान ...

- गजानन मोहोड

अमरावती- यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार असल्याने दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पाणीटंचाईच्या विविध योजनांसाठी यंदा प्राप्त वित्तीय अनुदानातून जिल्हानिहाय उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांना ४३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. सर्वाधिक १९ कोटी ४८ लाख ६१ हजारांचे अनुदान बुलडाणा जिल्ह्याला मिळणार आहे.

पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवस पाऊस झाल्याने जलस्रोतांची अवस्था बिकट आहे. दरवर्षी गावागावांतील यंत्रणांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनद्वारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा तो अद्यापही तयार झालेला नाही. यापूर्वीच्या कृती आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या कामांसाठी शासनाने वित्तीय अनुदान मंजूर केले असून, त्यापैकी ४३ कोटींचा निधी शुक्रवारी पाचही जिल्ह्यांना उपलब्ध करण्यात आला. त्यामधून होणाऱ्या उपाययोजनांतून पाणीटंचाईचा सामना केला जाईल. यामध्ये अमरावती जिल्ह्याला ७ कोटी ८५ लाख, अकोला १३ कोटी ५० लाख, बुलडाणा १९ कोटी ४८ लाख, यवतमाळ १ कोटी २० लाख, वाशिम जिल्ह्यास १ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध  करण्यात आले.उपलब्ध निधीतून नवीन विंधन विहिरी व कूपनलिकांसाठी अमरावती जिल्ह्यात ८८ लाख, अकोला २५.५६ लाख, बुलडाणा १०२.६० लाख, नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीकरिता अमरावती ५.३५ कोटी, बुलडाणा १.९० कोटी, वाशिम ११.२५ लाख, तात्पुुरत्या पूरक नळयोजना घेण्यासाठी अमरावती ६७ लाख, अकोला २५.५५ लाख, बुलडाणा ९२.५९ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अमरावती २५ लाख, बुलडाणा २.४६ कोटी, यवतमाळ ३२ लाख, वाशिम ६९.५६ लाख, खासगी विहीर अधिग्रहणासाठी अमरावती ७० लाख, अकोला १२.४८ लाख, बुलडाणा १.७४ कोटी, यवतमाळ ८८ लाख, तर वाशिम जिल्ह्यासाठी ६९.५६ लाख रुपये उपलब्ध करण्यात आले.

जिल्हानिहाय नळयोजनांचे अनुदानअकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपूर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ३.४४ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ७.८३ कोटी, देऊळघाट येथे ४९.५७ लाख, सिरपूरला ३८.३८ लाख, चिखली शहरासाठी २.५१ कोटी, शिंदखेडला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १८.१९ लाख आणि अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा ते खांबोरा उन्नई बंधाºयापर्यंत पाइप लाइनद्वारे पाणी आणण्यासाठी ९.४२ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले.

पाणीटंचाईचा कृती आराखडा केव्हा?यंदा जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा नाही. जानेवारीपासून किती गावांत पाणीटंचाई जाणवू शकते, याचा अंदाज जिल्हा परिषद प्रशासनातर्फे बांधला जात आहे. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे, कूपनलिका, विंधन विहीर, वीज बिलाचा भरणा न झाल्याने किती योजना बंद आहेत, किती गावांत टँकरची गरज आहे, या बाबींचा समावेश असणारा कृती आराखडा अद्यापही तयार नाही.