शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दीक्षांत समारंभ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गजबजले - उत्कंठा, उत्साह अन् लगबग

By admin | Updated: February 22, 2015 00:02 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळी १० वाजता एकतीसावा दिक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कंठा, उत्साह अन लगबग पाहायला मिळाली.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळी १० वाजता एकतीसावा दिक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कंठा, उत्साह अन लगबग पाहायला मिळाली. शनिवारी सकाळपासूनच विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांची पदवी प्राप्त करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास एकतिसाव्या दिक्षांत समारंभाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांचा उत्साह दिगुंणीत झाला. व्यासपीठावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाचे विश्राम जामदार, कुलगूरु मोहन खेडकर, प्र-कुलगुरु जयकीरण तिडके, कुलसचिव दिनेशकुमार जोशी, परिक्षा नियंत्रण जे.डी. वडते, व्यवस्थापन परिषेदचे सदस्य व सर्व अधिष्ठाताचे आगमन होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहात दिसून आला. सर्वप्रथम सरस्वती स्तवनानंतर विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. त्यांनतर कुलसचीवांनी कुलगुरुना पदवीकांक्षिना सादर करण्याची अनुमती माघितली. कुलगुरुनी अनुमती दिल्यावर पदवीप्रदान करण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम पंडित व आचार्य पदवीधारकांना कुलुगरुच्या हस्ते पदवी देण्यात आली. वाड:मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मोहम्मद समीउल्लाह यांनी उद्घोष करुन पंडित व आचार्य पदवीधारकांना व्यासपीठावर बोलाविले. कुलगुरुच्या हस्ते त्यांना पदवीप्रमाणपत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता एस.सी. रघुवंशी, आयु:शल्य विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता ए.व्ही. चांदेवार, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता पी.डब्ल्यू. काळे, शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता एम.एच.लाकडे, अभियांत्रिकी व तांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता जी.आर. बननोटे, समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता बी.एम.उपाख्य संतोष ठाकरे यांनी उद््््घोषणाकरून विद्यार्थ्यांना पंडित व आचार्य पदवी घेण्याकरिता व्यासपीठावर बोलाविला. विविध विद्याशाखेतील तत्वज्ञान पारंगत, पारंगत पदविका आणि स्नातक पदवीकांक्षी पदवीप्रदान करण्यात आली. त्यानंतर ९४ सुवर्ण २२ रौप्यपदके व २४ रोख पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. कुलगुरू यांनी प्रास्ताविक भाषणाला सुरुवात करुन विद्यापीठाचा इतीहास मांडून विकासात्मक दृष्टिकोन उपस्थितांना सांगितले. तसेच प्रमुख अतिथी विश्राम जामदार यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांना भविष्यातील यश प्राप्त करण्याचे मूलमंत्र दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचे वर्चस्व असल्याने जीकडे तिकडे विविध पोषाखातील विद्याथी दिसून येत होती. दीक्षांत समारंभाच्या शेवट राष्ट्रगीता करण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मिरवणुकीने मंडपाबाहेर प्रस्थान केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जनसपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी अथक परिश्रम घेतले.