शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मग्रारोहयोचे अभिसरण, वनविभागात संघर्ष पेटला, ९०० वनाधिकाऱ्यांचा एल्गार

By गणेश वासनिक | Updated: September 4, 2023 15:06 IST

वनसंरक्षणाची कामे थांबणार

गणेश वासनिक

अमरावती :वनविभागातील संरक्षण, वनसंवर्धनाच्या कामांमध्ये मग्रारोहयोला जोडत अभिसरण योजना आणली. राज्यातील ९०० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या योजनेच्या विरोधात एल्गार पुकारला असून, वने, वन्यजीव संरक्षण कामे यामुळे प्रभावित होणार असल्याचे दिसून येत आहे. या विषयांवरून वनसचिव आणि वनाधिकारी आमने - सामने आले आहेत.

वनविभागात वने, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन ही महत्त्वाची कामे राज्य योजनेच्या माध्यमातून केली जातात. मात्र, शासनाने या कामांना कात्री लावत यास मग्रारोहयो अभिसरण योजना अंतर्भूत करीत यास मान्यता दिली आहे. तसा आदेश प्रधान वनसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी २८ जुलै रोजी जारी केल्यामुळे वनविभागात या निर्णयाला कडाडून विरोध होताना दिसून येत आहे. अगोदरच मनुष्यबळ कमी, त्यात मानव - वन्यजीव संघर्ष, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे वनविभाग मेटाकुटीस आला असतानाच योजनेच्या कामांमध्ये मग्रारोहयो अभिसरण पद्धतीने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण हा आदेश निघण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही. योजनेला ९०० वनपरिक्षेत्र अधिकारी, ३०० सहायक वनसंरक्षक, १०० विभागीय वनअधिकारी अशा राज्य सेवेतील अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवीत राज्य शासनाला जिल्ह्याजिल्ह्यातून निवेदने पाठविण्यात आली आहेत. संरक्षण, संवर्धनाच्या कामात मग्रारोहयो नकोच, ही भूमिका वनाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

अभिसरणाचा निर्णय का?

वनविभागातील प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरणात मोठ्या प्रमाणात राज्य योजनेच्या माध्यमातून वने, वन्यजीव संरक्षण, रोपवन संवर्धन आणि जल - मृद संधारण, आग नियंत्रणाची कामे स्थानिक मजुरांकडून नियमित केली जातात. अभिसरणाच्या निर्णयामुळे जॉबधारक मजुरांना अशा कामांवर वापरता येईल. त्यात अर्धी देयके मग्रारोहयो आणि राज्य योजनेतून देण्याची शिफारस केली. परिणामी उच्च दर्जाची कामे, संरक्षण कामे करताना वनकर्मचाऱ्यांना कमालीची बाधा येईल. कारण मग्रारोहयो यास जोडल्यामुळे महसूल विभाग, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर अभिसरण योजना राबविण्यासाठी दबाव आणला जाईल आणि नियंत्रण महसूल विभागाचे असेल.

वर्षांनुवर्षे मग्रारोहयोचा निधी नाही

वनविभागातील सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव, प्रादेशिक रोहयो या उपविभागांना मग्रारोहयोची कामे घेण्याची सक्ती महसूल विभाग करीत असतो. ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वनविभाग असताना अकुशल कामांचा निधी वनविभागाला वेळेत मिळत नाही. मात्र, काम केल्यास वनाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यास महसूल विभाग पुढे येतो. मात्र, यावेळी वनाधिकाऱ्यांना वनविभागातील वरिष्ठ पाठबळ देण्यास धजावतात. सन २०१९पासून अकुशल निधी रखडलेला आहे. याबाबत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

संरक्षण, संवर्धन कामे प्रभावित

राज्य शासनाने वनविभागात चालणाऱ्या राज्य योजनेच्या कामांमध्ये मग्रारोहयोचा समावेश करणारा आदेश जारी केला असताना अगोदर प्रचलित देयक मग्रारोहयोतून अदा करताना उर्वरित रक्कम टॉपॲप अभिसरण योजनेच्या माध्यमातून वनविभागाला अदा करावयाची असेल. त्यामुळे वनविभागातील बारमाही संरक्षण संवर्धनाची कामे प्रभावीत होतील. कारण अभिसरण योजनेमुळे कामे करताना मग्रारोहयो अंतर्गत जॉबधारक मजूर कामांवर लावण्यात येतील. रोहयोत काम करणारे मजूर अंगमेहनतीची कामे करण्यास पुढे येणार नाहीत. त्याकारणाने वन संरक्षण संवर्धन कामे निश्चित वेळेत होणार नाहीत, याचा फटका वनविभागाला बसण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलAmravatiअमरावती